शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'तुमचे पालक चुकीचं काम करत नाहीत ना?'; सरकारचा विद्यार्थ्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 09:25 IST

खासगी आणि आक्षेपार्ह प्रश्नांमुळे सरकारवर टीकेची झोड

गुरुग्राम: खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना हरियाणा सरकारकडून देण्यात आलेल्या अर्जामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तुमच्या पालकांना काही आनुवांशिक आजार आहेत का?, तुमचे पालक चुकीच्या मार्गानं पैसा कमावतात का?, अशा प्रश्नांचा समावेश या अर्जात करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी हरियाणा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकारकडून खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज देण्यात आले आहेत. या अर्जाच्या माध्यमातून आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, धर्म, उत्पन्न आणि बँक खात्यांचा तपशील अशी माहिती मागवण्यात आली आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. 'विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरकार त्यांच्या पालकांची अत्यंत खासगी माहिती गोळा करत आहे. हा सर्व प्रकार अतिशय असंवेदनशील आहे. पालकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत चुकीचा आहे का?, असा प्रश्न विचारणं अतिशय धक्कादायक आहे,' असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. हरयाणा सरकारनं मात्र अर्जातून मागवलेल्या माहितीचं समर्थन केलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठीच विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा केली जात असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. हरियाणातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा अर्ज भरुन घेतला जातो, असे राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडूनही हा अर्ज भरुन घेतला जात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात खासगी शाळांनी मात्र हात वर केले आहेत. राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं अर्ज तयार केला असून संपूर्ण माहिती शाळा प्रशासनाला नव्हे, तर सरकारला हवी आहे, असं अनेक शाळांनी पालकांना सांगितलं आहे. अर्जातील काही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्यांची उत्तरं भरु नका, असं अनेक शाळांच्या व्यवस्थापनानं पालकांना सुचवलं आहे. 'तुमचे पालक चुकीच्या मार्गानं पैसे कमवत नाही का?, यासारख्या अनेक प्रश्नांवर पालकांना आक्षेप आहे. त्यामुळे अर्जातील असे प्रश्न तसेच सोडून द्या, असं आम्ही पालकांना सांगितलं आहे,' अशी माहिती दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अदिती मिश्रा यांनी यांनी दिली. 

टॅग्स :Haryanaहरयाणा