शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

आई-बाबा, फोन दूर ठेवा ना! तुमच्याशी बोलायचे आहे; स्मार्टफोन अन् सोशल मीडियामुळे वाढतोय दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 08:43 IST

सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालातून मुलांच्या मनातील गोष्टी बाहेर आल्या आहेत.

नवी दिल्ली: स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होत आहे. कुटुंबामध्ये सोशल मीडियाची ढवळाढवळ प्रचंड वाढली असून, लहान मुलांचे भावविश्व त्यामुळे पार उद्ध्वस्त होत आहे. आई-वडिलांच्या फोनमध्ये तुम्हाला काय हवे, असे या मुलांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तरे आत्मपरीक्षण करायला लावणारी होती. मुलांना आई- बाबांच्या मोबाइलमध्ये फक्त कॉलिंग, मेसेजिंग आणि कॅमेरा या तीनच सुविधा हव्यात.

 सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालातून मुलांच्या मनातील गोष्टी बाहेर आल्या आहेत.

स्मार्टफोनमुळे निर्माण झाली भिंत

मुलांना आई-वडिलांचा वेळ हवा आहे; पण त्यांच्यात स्मार्टफोनमुळे एक भिंत निर्माण झाली आहे. मुले आणि आई-वडिलांमधील नात्यावर स्मार्टफोनचे परिणाम जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. स्मार्टफोनमुळे नात्यांना तडा जाण्याचा धोका आहे, असा इशाराही सर्वेक्षणातून देण्यात आला आहे.

७६% आणि ७२ टक्के मुलांनी मान्य केले की, ते स्मार्टफोनशिवाय राहू शकत नाहीत. 

 ६४% मुलांनी मान्य केले की त्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. पेक्षा जास्त ६०% मुलांचा सोशल मीडियावरील वावर हा मित्रांवर अवलंबून आहे.

 ७६% मुले आणि पालकांना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे.

सोशल मीडियावर कोणाचा किती वेळ? 

■ सर्वेक्षणानुसार, आई-वडील दररोज सरासरी ५ तास, तर मुले ४ तास स्मार्टफोनवर वेळ घालवतात.

 ■ सर्वाधिक वेळ हा सोशल मीडिया व मनोरंजनाच्या अॅपवर दिला जातो.

 ■ तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तंत्रज्ञानाचा वापर हा सकारात्मक बदल आणि आयुष्य सुलभ होण्यासाठी व्हायला हवा. 

■ विशेष म्हणजे, आई-वडिलांच्या तुलनेत मुले स्मार्टफोनच्या दुष्परिणामांबाबत जागरूक आहेत, हे आढळले आहे.