शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:20 IST

आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे मौलाना तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. माझे जयपूरमधील विधान सरकारसाठी होते की, सरकारचा आत्मा हादरेल. पण ते हिंदू समाजासाठी आहे, असे मांडण्यात आले. पण तसे नाही, असे दिल्लीतील पत्रकार परिषदेत मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले. तसेच, आमचे तरुण आमच्या नियंत्रणात आहेत आणि आम्ही त्यांना नियंत्रणात ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका. पण, याचा अर्थ आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

मौलाना तौकीर रझा म्हणाले की, मी हिंदू समाजाचा अधिक विचार करतो. हजारो मुस्लिम मुलींना हिंदू मुलांनी फूस लावून नेले. हजारो हिंदू मुलींचा त्या हिंदू मुलांवर काही अधिकार होता की नाही? मौलाना तौकीर रझा पुढे म्हणाले की, आमच्या हिंदू तरुणांना त्यांच्या पालकांकडून चांगले संस्कार केले जात नाहीत. पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. तसेच, आपले म्हणणे देशाच्या हिताचे असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेत तौकीर रझा यांनी सांगितले.

पीएम मोदींवरही केली टिप्पणीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा मौलाना तौकीर रझा यांनी टिप्पणी केली आहे. मौलाना तौकीर रझा म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकजूट राहिलात तर सुरक्षित राहाल. पंतप्रधानांनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार बोलले पाहिजे. ते १४० कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. त्यांनी हे केवळ हिंदूंसाठीच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांसाठी सांगितले असते.

पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही- मौलाना तौकीर रझामौलाना तौकीर रझा म्हणाले की, जर आपल्या देशात अवैधपणे घुसखोर येत असतील तर ते आपल्या सरकारचे अपयश आहे. येथील मुस्लिमांवर नव्हे तर सुरक्षा दलांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. अखंड भारत बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत पसरलेला आहे. भारताकडे एवढी ताकद असेल तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा भारतात समावेश करा. तसेच, पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही. उलट ज्यांनी मुस्लिमांचा द्वेष केला, त्यांनीच पाकिस्तान निर्माण केला. ज्याला आरएसएस आणि हिंदू महासभेने पाठिंबा दिला होता, असेही मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले.

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत