शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:20 IST

आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे मौलाना तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. माझे जयपूरमधील विधान सरकारसाठी होते की, सरकारचा आत्मा हादरेल. पण ते हिंदू समाजासाठी आहे, असे मांडण्यात आले. पण तसे नाही, असे दिल्लीतील पत्रकार परिषदेत मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले. तसेच, आमचे तरुण आमच्या नियंत्रणात आहेत आणि आम्ही त्यांना नियंत्रणात ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका. पण, याचा अर्थ आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

मौलाना तौकीर रझा म्हणाले की, मी हिंदू समाजाचा अधिक विचार करतो. हजारो मुस्लिम मुलींना हिंदू मुलांनी फूस लावून नेले. हजारो हिंदू मुलींचा त्या हिंदू मुलांवर काही अधिकार होता की नाही? मौलाना तौकीर रझा पुढे म्हणाले की, आमच्या हिंदू तरुणांना त्यांच्या पालकांकडून चांगले संस्कार केले जात नाहीत. पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. तसेच, आपले म्हणणे देशाच्या हिताचे असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेत तौकीर रझा यांनी सांगितले.

पीएम मोदींवरही केली टिप्पणीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा मौलाना तौकीर रझा यांनी टिप्पणी केली आहे. मौलाना तौकीर रझा म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकजूट राहिलात तर सुरक्षित राहाल. पंतप्रधानांनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार बोलले पाहिजे. ते १४० कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. त्यांनी हे केवळ हिंदूंसाठीच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांसाठी सांगितले असते.

पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही- मौलाना तौकीर रझामौलाना तौकीर रझा म्हणाले की, जर आपल्या देशात अवैधपणे घुसखोर येत असतील तर ते आपल्या सरकारचे अपयश आहे. येथील मुस्लिमांवर नव्हे तर सुरक्षा दलांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. अखंड भारत बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत पसरलेला आहे. भारताकडे एवढी ताकद असेल तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा भारतात समावेश करा. तसेच, पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही. उलट ज्यांनी मुस्लिमांचा द्वेष केला, त्यांनीच पाकिस्तान निर्माण केला. ज्याला आरएसएस आणि हिंदू महासभेने पाठिंबा दिला होता, असेही मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले.

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत