शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:20 IST

आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे मौलाना तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. माझे जयपूरमधील विधान सरकारसाठी होते की, सरकारचा आत्मा हादरेल. पण ते हिंदू समाजासाठी आहे, असे मांडण्यात आले. पण तसे नाही, असे दिल्लीतील पत्रकार परिषदेत मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले. तसेच, आमचे तरुण आमच्या नियंत्रणात आहेत आणि आम्ही त्यांना नियंत्रणात ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका. पण, याचा अर्थ आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

मौलाना तौकीर रझा म्हणाले की, मी हिंदू समाजाचा अधिक विचार करतो. हजारो मुस्लिम मुलींना हिंदू मुलांनी फूस लावून नेले. हजारो हिंदू मुलींचा त्या हिंदू मुलांवर काही अधिकार होता की नाही? मौलाना तौकीर रझा पुढे म्हणाले की, आमच्या हिंदू तरुणांना त्यांच्या पालकांकडून चांगले संस्कार केले जात नाहीत. पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. तसेच, आपले म्हणणे देशाच्या हिताचे असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेत तौकीर रझा यांनी सांगितले.

पीएम मोदींवरही केली टिप्पणीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा मौलाना तौकीर रझा यांनी टिप्पणी केली आहे. मौलाना तौकीर रझा म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकजूट राहिलात तर सुरक्षित राहाल. पंतप्रधानांनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार बोलले पाहिजे. ते १४० कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. त्यांनी हे केवळ हिंदूंसाठीच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांसाठी सांगितले असते.

पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही- मौलाना तौकीर रझामौलाना तौकीर रझा म्हणाले की, जर आपल्या देशात अवैधपणे घुसखोर येत असतील तर ते आपल्या सरकारचे अपयश आहे. येथील मुस्लिमांवर नव्हे तर सुरक्षा दलांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. अखंड भारत बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत पसरलेला आहे. भारताकडे एवढी ताकद असेल तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा भारतात समावेश करा. तसेच, पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही. उलट ज्यांनी मुस्लिमांचा द्वेष केला, त्यांनीच पाकिस्तान निर्माण केला. ज्याला आरएसएस आणि हिंदू महासभेने पाठिंबा दिला होता, असेही मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले.

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत