शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील गेले मुलींना घरी सोडून

By admin | Updated: August 28, 2016 00:29 IST

मुलांना चार घास खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण घेत नाहीत ते असतात आईबाप. पण जे लहानग्या मुलांना वाऱ्यावर सोडून जातात, त्यांना म्हणावे तरी काय? ही कुठलीही

नवी दिल्ली : मुलांना चार घास खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण घेत नाहीत ते असतात आईबाप. पण जे लहानग्या मुलांना वाऱ्यावर सोडून जातात, त्यांना म्हणावे तरी काय? ही कुठलीही काल्पनिक कथा नाही, तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हे भीषण वास्तव आहे. दिल्लीबाहेरील समयपूर बादली या भागात गत आठवड्यात घडलेली ही घटना अंगावर काटा तर उभा करतेच; पण आई-वडिलांच्या ममतेवरही प्रश्नचिन्ह उभे करते. केवळ भुकेपोटी मरणाच्या दारातून परत आलेल्या या दोन मुलींची ही परिस्थिती हृदय हेलावून टाकणारी आहे. अलका (८) आणि ज्योती (३) या मुलींवर सध्या दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचे वडील बबलू हे १५ आॅगस्ट रोजीच घर सोडून निघून गेले. ३५ वर्षीय बबलू यांना दारूचे व्यसन असून, ते बेरोजगार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी आईनेही पाच वर्षाच्या मुलासह घर सोडले. गेल्या आठवड्यात १९ आॅगस्ट रोजी नेपाळी कॉलनीतील रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस तिथे दाखल झाले. एका घराच्या कोंदट खोलीत प्रवेश करताच खाटेवर निपचित पडलेल्या त्या दोन लहान मुली दिसल्या. घरात प्रचंड दुर्गंधी. डासांचा वावर. पोलिसांनी या अर्धमेल्या मुलींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मुलींच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्याचे इन्फेक्शन होत होते. डॉक्टरांनीही चार दिवस प्रयत्नांची शिकस्त करीत या मुलींना अक्षरश: मृत्यूच्या तावडीतून सोडवून आणले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)- पोलिसांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली आहे. या मुली पूर्ण बऱ्या होईपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश बालकल्याण समितीने दिले आहेत. त्यानंतर त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.