शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आई-वडील गेले मुलींना घरी सोडून

By admin | Updated: August 28, 2016 00:29 IST

मुलांना चार घास खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण घेत नाहीत ते असतात आईबाप. पण जे लहानग्या मुलांना वाऱ्यावर सोडून जातात, त्यांना म्हणावे तरी काय? ही कुठलीही

नवी दिल्ली : मुलांना चार घास खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण घेत नाहीत ते असतात आईबाप. पण जे लहानग्या मुलांना वाऱ्यावर सोडून जातात, त्यांना म्हणावे तरी काय? ही कुठलीही काल्पनिक कथा नाही, तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हे भीषण वास्तव आहे. दिल्लीबाहेरील समयपूर बादली या भागात गत आठवड्यात घडलेली ही घटना अंगावर काटा तर उभा करतेच; पण आई-वडिलांच्या ममतेवरही प्रश्नचिन्ह उभे करते. केवळ भुकेपोटी मरणाच्या दारातून परत आलेल्या या दोन मुलींची ही परिस्थिती हृदय हेलावून टाकणारी आहे. अलका (८) आणि ज्योती (३) या मुलींवर सध्या दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचे वडील बबलू हे १५ आॅगस्ट रोजीच घर सोडून निघून गेले. ३५ वर्षीय बबलू यांना दारूचे व्यसन असून, ते बेरोजगार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी आईनेही पाच वर्षाच्या मुलासह घर सोडले. गेल्या आठवड्यात १९ आॅगस्ट रोजी नेपाळी कॉलनीतील रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस तिथे दाखल झाले. एका घराच्या कोंदट खोलीत प्रवेश करताच खाटेवर निपचित पडलेल्या त्या दोन लहान मुली दिसल्या. घरात प्रचंड दुर्गंधी. डासांचा वावर. पोलिसांनी या अर्धमेल्या मुलींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मुलींच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्याचे इन्फेक्शन होत होते. डॉक्टरांनीही चार दिवस प्रयत्नांची शिकस्त करीत या मुलींना अक्षरश: मृत्यूच्या तावडीतून सोडवून आणले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)- पोलिसांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली आहे. या मुली पूर्ण बऱ्या होईपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश बालकल्याण समितीने दिले आहेत. त्यानंतर त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.