शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

प. बंगालमध्ये पंचायत निवडणूक मतदानात हिंसाचार; १२ ठार, ४३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:52 IST

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसाचारात १२ ठार तर ४३ जण जखमी झाले आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसाचारात १२ ठार तर ४३ जण जखमी झाले आहेत. राज्यात ६० हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असतानाही उसळलेला हिंसाचार रोखता आला नाही. दिवसभरात ७३ टक्के इतके मतदान झाले.सत्ता टिकवू पाहाणारी तृणमूल काँग्रेस, अस्तित्व राखण्यासाठी चाललेली काँग्रेसची धडपड व सत्ता हाती नसल्याने गलितगात्र असलेला माकप व अन्य डावे पक्ष तसेच विरोधी पक्ष तसेच अत्यंत आक्रमक बनलेला भाजपा हे पंचायत निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. राज्यातील उत्तर २४ परगणा, नादिया, दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांत झालेल्या हिंसक घटनांत तीन जण ठार झाले तर मुर्शिदाबाद येथील सुरजपूर गावात एका व्यक्तीला गोळ््या घालून ठार मारण्यात आले अशी माहिती राज्य निवडणुक आयोगाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. सूरजपूरमध्ये हत्या करण्यात आलेला व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता होता असा दावा मुर्शिदाबाद जिल्ह्यातीलभाजप नेते सुभाष मोंडल यांनी केला आहे.>बॉम्बस्फोट घडविलेदक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामध्ये तपन येथे हिंसाचारात एक व्यक्ती ठार तर चार जखमी झाले. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात व दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातही मतदानकेंद्राबाहेर बॉम्बस्फोट झाला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी मिरची पूड फेकण्याचेही प्रकार घडले.>आढळले तीन क्रूड बॉम्बउत्तर दिनजापूर जिल्ह्यातील गलईसूरामध्ये मतदान केंद्राच्या परिसरात तीन क्रूड बॉम्ब सापडले. त्यापैकी दोन क्रूड बॉम्ब हे रेल्वे रुळांवर ठेवलेले होते. या घटनेमुळे येथील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बसंती भागात मतदानकेंद्रांच्या बाहेर चेहरे झाकून घेतलेले काही बंदूकधारी फिरतानाची दृश्ये वृत्तवाहिन्यांनी दाखविली.