शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची 'मन की बात' आता शब्द रूपातही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 14:21 IST

मुंबई, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर महिना अखेरला प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रम आता शब्द रुपात उपलब्ध झाला आहेकाल शनिवारी मुंबईतील राजभवनात मन की बात या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला राज्यपाल सी ...

मुंबई, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर महिना अखेरला प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रम आता शब्द रुपात उपलब्ध झाला आहेकाल शनिवारी मुंबईतील राजभवनात मन की बात या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनचे संस्थापक संचालक हितेश जैन आदी उपस्थित होते. देशातील सर्वात जुनं मात्र आजही प्रभावी असलेल्या रेडिओ या माध्यमाद्वारे या उपक्रमाची सुरूवात झाली असली तरी आज टिव्ही, मोबाईल, इंटरनेट या सर्व माध्यमांवर मन की बात उपलब्ध आहे.स्वातंत्र्य सैनिकांनी रेडिओच्या माध्यमाचा वापर जनतेपर्यंत विचार पोहोचविण्यासाठी केला होता. आज दूरचित्रवाणी क्रांतीप्रमाणेच प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी रेडिओसारखे माध्यम वापरुन 'मन की बात' द्वारे शिक्षण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत, बेटी बचाओ अभियान, महिला सक्षमीकरण आदी अनेक क्षेत्रात लोकांच्याच कल्पनांना आकार देत लोकसहभागाचा अद्वितीय संवाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला आहे, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केले.मोदींच्या काही क्रांतिकारी कल्पनांनी लोकांच्या मनात, विशेषतः मुले आणि युवकांच्या मनावर सामाजिक कार्य करण्यासाठी खोल परिणाम केला आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, मन की बातच्या माध्यमातून मोदींनी लावलेले क्रांतिचे बीज येत्या कालावधीत फळ देईल. यासाठी केंद्र व राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे आणि कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) यांना समाजहिताच्या कामात गुंतवावे लागेल आणि बांधिलकीने काम करावे लागेल. यावेळी राज्यपालांनी राजभवनची इमारत दिव्यांग-सुलभ बनविण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानुसार राजभवनमधील इमारतींमध्ये दिव्यांगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प बनविण्यात येणार आहे.प्रधानमंत्री मोदी हे समाजाला प्रेरित करू शकतात ही त्यांना मोठी देणगी आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजात चांगले काम करण्याची इच्छा असलेले अनेक लोक आहेत; मात्र त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. प्रधानमंत्र्यांनी 'मन की बात' द्वारे लाखो लोकांना प्रेरित करण्याचे काम केले. 'मन की बात' हे केवळ प्रधानमंत्र्यांच्या मनातील विचार नसून सर्वसामान्यांच्या मनातील विचार आहेत. 'मन की बात' पूर्ण भारताला संमोहित करतेच; मात्र आगामी काळात संवाद मुत्सद्दी असणाऱ्या व्यक्तींनाही आपली संवादाची दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन करणारी आहे.