शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

पाकला ‘क्लीन चिट’ दिल्याने रणकंदन

By admin | Updated: June 4, 2016 02:40 IST

पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख शरद कुमार यांनी म्हटल्यामुळे नवा वाद पेटला आहे.

नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख शरद कुमार यांनी म्हटल्यामुळे नवा वाद पेटला आहे. कुमार यांच्या दाव्यामुळे पाकिस्तानला आनंदाच्या उकळ््या फुटल्या आहेत. आमची भुमिका दहशतवादविरोधी असल्याचे आम्ही खूप आधीपासून सांगत आलो असून तेच खरे ठरल्याची मखलाशी त्याने केली. दरम्यान, पाकला क्लिनचिट दिल्यावरून राजकीय रणकंदन सुरू झाले असताना परराष्ट्र मंत्रालयाने पठाणकोट हल्ल्यात पाकच्या सहभागाचे पुरेसे पुरावे असल्याचे सांगत सरकारची बूज राखण्याचा प्रयत्न केला. एनआयएप्रमुखांनी ‘न्यूज १८ डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, पाक सरकार किंवा त्यांच्या संघटनांनी पठाणकोट हल्ल्यासंदर्भात जैश-ए-मोहंमद किंवा मसूद अझहर याला मदत केली असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. कुमार यांच्या या मुलाखतीनंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी टिष्ट्वट केले की, पाकिस्तान दीर्घ काळापासून आपण दहशतवादाविरुद्ध असल्याचे सांगत आला आहे. एनआयए महासंचालकांच्या विधानातून पाकची भूमिका खरी असल्याचे सिद्ध झाले.