शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाकची युद्धाची हिंमत नाही

By admin | Updated: September 30, 2016 01:43 IST

नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधून भारतीय लष्कराने तडाखेबाज उत्तर दिले आहे. तथापि, पाकही दहशतवादी कारवायांचा जोर वाढवून भारतातील

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधून भारतीय लष्कराने तडाखेबाज उत्तर दिले आहे. तथापि, पाकही दहशतवादी कारवायांचा जोर वाढवून भारतातील निवडक शहरे, लष्करी ठिकाणे व इतर प्रमुख ठिकाणांंवर दहशतवादी हल्ला करून पलटवार करू शकतो. कारण भारताशी थेट युद्ध करण्याची पाकिस्तानची तयारी नाही, असे सांगत संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर व्ही. महालिंगम म्हणाले की, आम्हाला सज्ज राहावे लागेल.‘लोकमत’शी बोलताना महालिंगम म्हणाले की, पाकिस्तान पलटवार करू शकतो. सीमापार सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्याआधी भारताने जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पाडला. भारताने यादृष्टीने चांगले राजनैतिक प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, चीन आपल्याच समस्येत गुरफटला आहे. चीनला थेट हस्तक्षेप करण्यासाठी कोणताही आधार नाही. पाकिस्तानला शंभर वेळा विचार करावा लागेल...उरी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या बलिदानाचा बदला घेत भारताने चोख उत्तर दिले आहे, असे ठाम मत लेफ्ट. जनरल आर.एस. कदयाल यांनी व्यक्त केले. पाकिस्तान राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या एवढा दुबळा आहे की, पलटवार करण्याआधी पाकिस्तानला शंभर वेळा विचार करावा लागेल. दोन युद्धांत पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे. तेव्हा तो तिसऱ्यांदा अशी चूक करणार नाही. तथापि, नियंत्रण रेषेलगत २४ तास सतर्क राहावे लागेल. कारण आमच्यासाठी सीमा अधिक संवेदनशील बनली आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तानच्या बाजूने दहशतवादी हल्ला आणि घुसखोरी होऊ शकते. संरक्षणतज्ज्ञ आणि माजी डीजीएमओ विनोद भाटिया म्हणाले की, भारताने निवडक दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. हल्ला केला नाही. ७-८ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आम्हाला यश आले. भारताच्या संरक्षण धोरणात लक्षणीय बदल...पाकिस्तान पलटवार करू शकतो. तथापि, त्याचे स्वरूप कसे असेल, याचा अंदाज बांधणे सोपे नाही. भारताची क्षमता, सामर्थ्य पाकिस्तान जाणून आहे. तेव्हा असे पाऊल उचलण्याआधी पाकिस्तान याबाबत आकलन जरूर करील, असे निवृत्त एअर मार्शल ए. अहलुवालिया म्हणाले. भारताच्या संरक्षण धोरणात लक्षणीय बदल झाला आहे, असे बव्हंशी संरक्षणतज्ज्ञांना वाटते. आजवर भारत राजनैतिक धैर्याचे धोरण अंगीकारत होता. आता तर थेट हल्लाच केला आहे.