शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या बलुचिस्तानच्या भुमिकेमुळे पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला?

By admin | Updated: September 18, 2016 14:46 IST

उरी दहशतवादी हल्ल्यासाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी पाकिस्तानवर आरोप केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने हा हल्ला घडवला असावा

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १८ : आज पहाटे बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावरील दहशतवादयाने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर भारतीय जवानांना चारही दहशतवादयाचा खात्मा करण्यात यश आले आहे. या हल्ल्यासाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी पाकिस्तानवर आरोप केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने हा हल्ला घडवला असावा अशी शक्यताही केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिका-यांनी वर्तवली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकराने बलुचिस्थान बाबत उचलेल्या पावलामुळे पाकिस्तानला मिरच्या चांगल्या झोंबलेल्या दिसत असल्याचे नेटिझमचे मत आहे. १५ ऑगस्टनंतर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणा-या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू झाली. यावेळी आक्रमक झालेल्या बलूची लोकांनी पाकिस्तानचा झेंडाही तुडवला आहे. तसेच सुई, डेरा बुगती, जाफराबाद, नसिराबादसह बलुचिस्तानच्या इतर भागांतही पाकिस्तानच्या अन्यायाविरोधात जोरदार आंदोलनं झाली. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला होता. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. तर पाकिस्तान इथे नरसंहार करतो. पाकिस्तानी सैन्य प्रत्येक दिवशी डझनभर तरुणांची हत्या करतो. हजारो नागरिक बेपत्ता आहेत. पाकिस्तानने बलुचांना गुलाम बनवलं आहे, असा दावा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थक नेते ब्रह्मदाग बुगती यांनी केला होता.दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना जबरदस्तीनं बलुचिस्तानवर उघडपणे बोलून धोक्‍याची सीमारेषा ओलांडली आहे, असं वक्तव्य पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या नफिस झकेरिया यांनी केलं होत. भारताच्या इतिहासात प्रथमच अधिकृतपणे भारताने पाकिस्तानच्या विरोधात बलुचिस्तानचा प्रश्न उघड केला होता, बलुची नेत्यांनी त्याचे जाहीर स्वागतही केले जात आहे. ब्राहमदाह बुगती, शेर मोहम्मद बुगती आणि अझिझुल्लाह बुगती या बलुचिस्तानमधल्या व आता स्वित्झर्लंडच्या आश्रयाला असलेल्या नेत्यांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे, बलुची नेत्यांची ही जुनी मागणी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही पाकिस्तानविरोधात बलुचिस्तानसाठी भारतीय कागदपत्रांच्या आधारे मोर्चेबांधणी करू अशी त्यांची भूमिका आहे. बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टीचे हे नेते असून पाकिस्तानने हा पक्ष बेकायदेशीर ठरवला आहे. तर आम्ही नरेंद्र मोदींचे आभारी असून त्यांना आमचा पाठिंबा आहे, यामध्ये कुणाला काय वाटायचे ते वाटू अशी स्पष्टोक्ती एका बलुची नेत्यांनी दिली आहे.हा हल्ला पाकिस्ताननेच केला आहे. गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला गांभीर्याने घेतला असून आता हल्ले सहन केले जाणार नाहीत असे वकत्व्य संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केलं आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळलेल्या बलूची लोकांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिली आहे. विशेष म्हणजे बलुचिस्तानमधले शहीद म्हणून ओळखले जाणारे नेते अकबर बुगती यांच्या फोटोसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही झळकले होते. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये बुरहान वानी या दहशतवाद्याचा खात्मा झाल्यापासून दंगल सुरु होती. पाकिस्ताननेही उघडपणे या आंदोलनाचे समर्थन करत बुरहान वानीला शहीदाचा दर्जा दिला होता. दोन महिने सुरु असलेल्या हिंसाचारात सुमारे ८६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले होते. आता अथक प्रयत्नानंतर हा हिंसाचार थांबवण्यात यश येत असतानाच उरीत दहशतवादी हल्ला झाला आहे.