शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

घुसखोरीच्या प्रयत्नात पाकिस्तानचे होतेय जबर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 14:34 IST

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये मोठया प्रमाणावर त्यांचे दहशतवादी मारले जात आहेत.

ठळक मुद्देसीमेवर भारतीय लष्कराने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले. सुरक्षापथकांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले.

नवी दिल्ली, दि. 4 -जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये मोठया प्रमाणावर त्यांचे दहशतवादी मारले जात आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. पाकिस्तानला लागून असणआ-या सीमेवर भारतीय लष्कराने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले असून, घुसखोरी रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली आहेत असे अरुण जेटली यांनी सांगितले. 

पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत असे त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना सांगितले. सर्तक असलेल्या सुरक्षापथकांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले असून, दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे असे जेटली म्हणाले. नियंत्रण रेषेवर यावर्षात पाकिस्तानने आतापर्यंत 285 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 2016 च्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. त्यावर्षी पाकिस्तानने वर्षभरात 228 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. 

आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून 221 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. इथे सीमा सुरक्षा दल आणि लष्कर तैनात असते. लष्कराने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर AIOS म्हणजे घुसखोरी रोखणारी सिस्टिम तयार केली आहे असे जेटलींनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी रडार, सेन्सर्स आणि थर्मल इमेजर्सच्या मदतीने टेहळणी सुरु असते अशी माहिती त्यांनी दिली. 

अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याचा एन्काऊंटरजम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले. ठार करण्यात आलेला दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली.  मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले.