शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पाकिस्तानचा खोटारडेपणा, जाधव गुप्तहेर असल्याचे पुरावेच नाहीत

By admin | Updated: April 10, 2017 22:23 IST

पाकिस्तानने सोमवारी भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तान जाधव यांना भारताचा गुप्तहेर असल्याचं सांगत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सोमवारी भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना  फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तान जाधव यांना भारताचा गुप्तहेर असल्याचं सांगत आहे. पण या घटनाक्रमात समोर आलेल्या काही गोष्टींमुळे जाधव हे भारताचे गुप्तहेर नसल्याचे पुरावे समोर येत आहेत, त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे.    
 
जाधव यांना भारतीय पासपोर्टसह पकडण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या पासपोर्टवर त्यांचं दुसरं नाव  हुस्नी मुबारक पटेल असल्याचं सांगण्यात आलंय. पण गुप्तहेरांकडे पासपोर्ट दिले जात नाहीत असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा हा दावा खोटा ठरतो.  
 
याशिवाय स्वतः पाकिस्तान सरकारचे परराष्ट्र विषयक सल्लागार सरताज अजिज यांनी गेल्या वर्षी 7 डिसेंबरला केलेल्या एका विधानात जाधव यांच्याविरोधात भक्कम पुरावे नसल्याचं म्हटलं होतं. पाकिस्तानने ईराणमध्येही जाधव यांच्याबाबत चौकशी केलीपण त्यातूनही काही साध्य झालं नाही. पाकिस्तानने जाधव यांना अटक केल्याच्या एका महिन्यानंतर जाधव यांनी भारताचे गुप्तहेर असल्याचं कबुल केल्याचा एक व्हिडीओ सादर केला, पण तो व्हिडीओ खोटा असल्याचं भारतानं तेव्हाच सांगितलं होतं.
 
पाकच्या कैद्यांची सुटका रद्द- 
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी कठोर पावलं उचलली असून पाकिस्तानच्या डझनभर कैद्यांना सोडण्याचा निर्णय भारताने तडकाफडकी रद्द केला आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानच्या 12 कैद्यांना येत्या बुधवारी सोडण्यात येणार होते. 
 
जाधव यांना फाशी म्हणजे हत्येचा पूर्वनियोजित कट,भारतानं ठणकावलं-
भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. जाधव यांना फाशी झाल्यास तो हत्येचा पूर्वनियोजित कट ठरेल अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे.
 
 
कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी रावळपिंडीच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताने  पाकिस्तानच्या या निर्णयाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.  परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून विरोधाचे पत्र सोपवले.
 
या पत्रात भारताने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावली जाताना अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली केल्याचे म्हटले आहे.तसेच पाकिस्तानने जाधव यांना बलुचिस्तानमध्ये पकडल्याचा दावा खोटा असून त्यांचे इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं असा आरोप भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. जाधव यांच्यावर चालवण्यात आलेला खटला बनावट होता असं भारताने पाकला सांगितलं असून  याशिवाय, कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर भारत त्याच्याकडे पूर्वनियोजित हत्येचा कट म्हणूनच पाहिल, असे या पत्रात म्हटले आहे.