शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा लोकवस्तींवर गोळीबार; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 02:16 IST

पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्या आणि लोकवस्तींवर केलेल्या गोळीबारात

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्या आणि लोकवस्तींवर केलेल्या गोळीबारात ३ नागरिक ठार, तर १७ जखमी झाले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) प्रत्युत्तरात कारवाई केली.दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी पाकिस्तानच्या गोळीबाराची तीव्र शब्दांत निंदा करताना आंतरराष्ट्रीय समुदायाने या देशाला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.बीएसएफच्या प्रवक्त्याने सविस्तर माहिती देताना सांगितले की, पाक सैनिकांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. प्रारंभी लहान शस्त्रांचा वापर केल्यानंतर आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करण्यात आला. किशनपूर, जोर फार्म, जुगनू चक, नवापिंड, घरना, सिया,अब्दुल्लियान आणि चंदू चक या आर.एस.पुरा सेक्टरमधील भागात गुरुवारी रात्री १.४५ वाजताच्या सुमारास गोळीबार आणि तोफा डागण्यास सुरुवात झाली, तर अर्निया सेक्टरच्या इतर वस्त्यांमध्ये पहाटे ४ वाजता पाकच्या सैनिकांनी गोळीबार केला. सीमेवरील दुर्गम गावांनाही त्याचा फटका बसला. गोळीबारात तीन नागरिकांचा बळी गेला, तर १७ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये दोन आर.एस.पुरा, तर एक अर्निया सेक्टरमधील आहे. गोळीबारात अनेक जनावरे जखमी झाली असून काही इमारतींचेही नुकसान झाले असल्याचे जम्मूचे पोलीस उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी सांगितले. बीएसएफच्या जवानांनीही सडेतोड उत्तर देत पाकिस्तानी बाजूच्या आघाडीच्या चौक्यांवर गोळीबार केला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. (वृत्तसंस्था)मुत्सद्देगिरीत अपयश आल्याने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडला आहे. जगापुढे तोंड दाखविण्याची हिंमत या देशात राहिलेली नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्येतूनच सीमेवर त्याच्या कुरापती सुरू आहेत. त्यातच बारामुल्ला जिल्ह्याच्या राफियाबादमध्ये दहशतवाद्याला पकडण्यात आल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. -निर्मलसिंग, उपमुख्यमंत्री, जम्मू-काश्मीरदिवसाचा प्रारंभ अत्यंत भयावह झाला. भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीबाबत थंड डोक्याने विचार आणि सद्बुद्धीने काम करतील अशी अपेक्षा आहे.-ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री,जम्मू-काश्मीर