शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा लोकवस्तींवर गोळीबार; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 02:16 IST

पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्या आणि लोकवस्तींवर केलेल्या गोळीबारात

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्या आणि लोकवस्तींवर केलेल्या गोळीबारात ३ नागरिक ठार, तर १७ जखमी झाले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) प्रत्युत्तरात कारवाई केली.दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी पाकिस्तानच्या गोळीबाराची तीव्र शब्दांत निंदा करताना आंतरराष्ट्रीय समुदायाने या देशाला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.बीएसएफच्या प्रवक्त्याने सविस्तर माहिती देताना सांगितले की, पाक सैनिकांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. प्रारंभी लहान शस्त्रांचा वापर केल्यानंतर आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करण्यात आला. किशनपूर, जोर फार्म, जुगनू चक, नवापिंड, घरना, सिया,अब्दुल्लियान आणि चंदू चक या आर.एस.पुरा सेक्टरमधील भागात गुरुवारी रात्री १.४५ वाजताच्या सुमारास गोळीबार आणि तोफा डागण्यास सुरुवात झाली, तर अर्निया सेक्टरच्या इतर वस्त्यांमध्ये पहाटे ४ वाजता पाकच्या सैनिकांनी गोळीबार केला. सीमेवरील दुर्गम गावांनाही त्याचा फटका बसला. गोळीबारात तीन नागरिकांचा बळी गेला, तर १७ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये दोन आर.एस.पुरा, तर एक अर्निया सेक्टरमधील आहे. गोळीबारात अनेक जनावरे जखमी झाली असून काही इमारतींचेही नुकसान झाले असल्याचे जम्मूचे पोलीस उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी सांगितले. बीएसएफच्या जवानांनीही सडेतोड उत्तर देत पाकिस्तानी बाजूच्या आघाडीच्या चौक्यांवर गोळीबार केला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. (वृत्तसंस्था)मुत्सद्देगिरीत अपयश आल्याने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडला आहे. जगापुढे तोंड दाखविण्याची हिंमत या देशात राहिलेली नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्येतूनच सीमेवर त्याच्या कुरापती सुरू आहेत. त्यातच बारामुल्ला जिल्ह्याच्या राफियाबादमध्ये दहशतवाद्याला पकडण्यात आल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. -निर्मलसिंग, उपमुख्यमंत्री, जम्मू-काश्मीरदिवसाचा प्रारंभ अत्यंत भयावह झाला. भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीबाबत थंड डोक्याने विचार आणि सद्बुद्धीने काम करतील अशी अपेक्षा आहे.-ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री,जम्मू-काश्मीर