शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पाकचा लोकवस्तींवर गोळीबार; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 02:16 IST

पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्या आणि लोकवस्तींवर केलेल्या गोळीबारात

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्या आणि लोकवस्तींवर केलेल्या गोळीबारात ३ नागरिक ठार, तर १७ जखमी झाले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) प्रत्युत्तरात कारवाई केली.दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी पाकिस्तानच्या गोळीबाराची तीव्र शब्दांत निंदा करताना आंतरराष्ट्रीय समुदायाने या देशाला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.बीएसएफच्या प्रवक्त्याने सविस्तर माहिती देताना सांगितले की, पाक सैनिकांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. प्रारंभी लहान शस्त्रांचा वापर केल्यानंतर आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करण्यात आला. किशनपूर, जोर फार्म, जुगनू चक, नवापिंड, घरना, सिया,अब्दुल्लियान आणि चंदू चक या आर.एस.पुरा सेक्टरमधील भागात गुरुवारी रात्री १.४५ वाजताच्या सुमारास गोळीबार आणि तोफा डागण्यास सुरुवात झाली, तर अर्निया सेक्टरच्या इतर वस्त्यांमध्ये पहाटे ४ वाजता पाकच्या सैनिकांनी गोळीबार केला. सीमेवरील दुर्गम गावांनाही त्याचा फटका बसला. गोळीबारात तीन नागरिकांचा बळी गेला, तर १७ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये दोन आर.एस.पुरा, तर एक अर्निया सेक्टरमधील आहे. गोळीबारात अनेक जनावरे जखमी झाली असून काही इमारतींचेही नुकसान झाले असल्याचे जम्मूचे पोलीस उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी सांगितले. बीएसएफच्या जवानांनीही सडेतोड उत्तर देत पाकिस्तानी बाजूच्या आघाडीच्या चौक्यांवर गोळीबार केला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. (वृत्तसंस्था)मुत्सद्देगिरीत अपयश आल्याने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडला आहे. जगापुढे तोंड दाखविण्याची हिंमत या देशात राहिलेली नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्येतूनच सीमेवर त्याच्या कुरापती सुरू आहेत. त्यातच बारामुल्ला जिल्ह्याच्या राफियाबादमध्ये दहशतवाद्याला पकडण्यात आल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. -निर्मलसिंग, उपमुख्यमंत्री, जम्मू-काश्मीरदिवसाचा प्रारंभ अत्यंत भयावह झाला. भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीबाबत थंड डोक्याने विचार आणि सद्बुद्धीने काम करतील अशी अपेक्षा आहे.-ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री,जम्मू-काश्मीर