शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे

By admin | Updated: September 19, 2016 07:26 IST

भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले

श्रीनगर/ नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले तर इतर १९ जखमी झाले. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. हल्ल्यानंतर लष्कराने सुमारे तीन तास केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत चारही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. हे चारही हल्लेखोर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रे होती, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याने भारताविरुद्ध दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून यामागे असलेल्यांना धडा शिकविला जाईल, अशी ग्वाही दिली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नियोजित दौरा रद्द करून दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला व दहशतवादी पाकिस्तानला एकटे पाडण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही तातडीने काश्मीरला जाऊन साद्यंत माहिती घेतली तर लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देऊन तेथील सज्जतेची पाहणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>दहा दिवसांपूर्वीच दिला होता अ‍ॅलर्ट सीमा ओलांडून पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांची नवी तुकडी काश्मीरमध्ये घुसली आहे व त्यांचे लक्ष्य उरी हे असू शकते, अशा स्पष्ट माहितीचा अ‍ॅलर्ट गुप्तचर संस्थांनी तीनच दिवसांपूर्वी दिला होता, असे माहितगार सूत्रांकडून समजते. श्रीनगरमधील लष्कराच्या १५व्या कॉर्पस््चे निवृत्त ध्वजाधिकारी व उरी येथील लष्करी तळाचे पूर्वी स्वत: कमांडर राहिलेले लेफ्ट. जनरल एस.ए. हसनैन यांनी तर टिष्ट्वटरवर याची जाहीर वाच्यताही केली. त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, दहाच दिवसांपूर्वी उरी येथील ब्रिगेड कमांडरना मी स्वत: असा हल्ला केव्हाही होऊ शकतो याविषयी सावध केले होते. दोन वर्षांपूर्वी उरी भागातीलच मोहरा येथील लष्करी छावणीवर असाच दहशतवादी हल्ला झाला होता. ते ठिकाण रविवारच्या हल्ल्यापासून जेमतेम १५ किमी अंतरावर आहे.>असा झाला उरी हल्लाउरी तळाच्या मागील बाजूस असलेल्या प्रशासकीय भागातून हे सशस्त्र दहशतवादी आत घुसले. तेथील मोकळ्या जागेत नव्याने आलेल्या तुकड्यांमधील सैनिकांसाठी तंबू व तात्पुरते निवारे उभारलेले होते. हल्लेखोरांनी रायफलींमधून अंदाधुंद गोळीबार करतानाच आगीचे लोळ फेकणारी शस्त्रे डागली. शहीद झालेल्या १७ जवानांपैकी १३-१४ जणांचा मृत्यू ते झोपलेल्या तंबूंना लागलेल्या आगीमुळे झाला. प्राणाहुती दिलेले बहुतांश जवान १० डोगरा आणि ६ बिहार रेजिमेंटचे होते. १९ जखमी जवानांना हेलिकॉप्टरने श्रीनगर येथील लष्कराच्या बेस इस्पितळात हलविण्यात आले.>चार एके-४७, रॉकेट लॉन्चर्स या हल्ल्याविषयी प्रसिद्धिमाध्यमांना माहिती देताना लष्कराचे डायरेक्टर जनरल आॅफ मिलिटरी आॅपरेशन्स (डीजीएमओ) लेफ्ट. जनरल रणबीर सिंग म्हणाले की, हे हल्लेखोर परकीय होते. यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची आमची प्राथमिक माहिती आहे. लष्कराने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत जे चार हल्लेखोर ठार झाले त्यांच्याकडे चार एके-४७ रायफल, अंडर बॅरेल रॉकेट लॉन्चर्स आणि अन्य प्रकारचे युद्धसाहित्य मिळाले. या सर्व शस्त्रांवर पाकिस्तानची मार्किंग्ज् आहेत. (म्हणजेच ही शस्त्रे पाकिस्तानी बनावटीची आहेत.)पाक म्हणतो, आमच्या माथी खापर नकोपाकिस्तानने मात्र या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नाही. जरा काही खुट्ट झाले की कोणतीही शहानिशा न करता आमच्या माथी खापर फोडण्याची भारताला खोड जडली आहे, असा कांगावा करून हात वर केले.