शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे

By admin | Updated: September 19, 2016 07:26 IST

भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले

श्रीनगर/ नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले तर इतर १९ जखमी झाले. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. हल्ल्यानंतर लष्कराने सुमारे तीन तास केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत चारही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. हे चारही हल्लेखोर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रे होती, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याने भारताविरुद्ध दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून यामागे असलेल्यांना धडा शिकविला जाईल, अशी ग्वाही दिली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नियोजित दौरा रद्द करून दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला व दहशतवादी पाकिस्तानला एकटे पाडण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही तातडीने काश्मीरला जाऊन साद्यंत माहिती घेतली तर लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देऊन तेथील सज्जतेची पाहणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>दहा दिवसांपूर्वीच दिला होता अ‍ॅलर्ट सीमा ओलांडून पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांची नवी तुकडी काश्मीरमध्ये घुसली आहे व त्यांचे लक्ष्य उरी हे असू शकते, अशा स्पष्ट माहितीचा अ‍ॅलर्ट गुप्तचर संस्थांनी तीनच दिवसांपूर्वी दिला होता, असे माहितगार सूत्रांकडून समजते. श्रीनगरमधील लष्कराच्या १५व्या कॉर्पस््चे निवृत्त ध्वजाधिकारी व उरी येथील लष्करी तळाचे पूर्वी स्वत: कमांडर राहिलेले लेफ्ट. जनरल एस.ए. हसनैन यांनी तर टिष्ट्वटरवर याची जाहीर वाच्यताही केली. त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, दहाच दिवसांपूर्वी उरी येथील ब्रिगेड कमांडरना मी स्वत: असा हल्ला केव्हाही होऊ शकतो याविषयी सावध केले होते. दोन वर्षांपूर्वी उरी भागातीलच मोहरा येथील लष्करी छावणीवर असाच दहशतवादी हल्ला झाला होता. ते ठिकाण रविवारच्या हल्ल्यापासून जेमतेम १५ किमी अंतरावर आहे.>असा झाला उरी हल्लाउरी तळाच्या मागील बाजूस असलेल्या प्रशासकीय भागातून हे सशस्त्र दहशतवादी आत घुसले. तेथील मोकळ्या जागेत नव्याने आलेल्या तुकड्यांमधील सैनिकांसाठी तंबू व तात्पुरते निवारे उभारलेले होते. हल्लेखोरांनी रायफलींमधून अंदाधुंद गोळीबार करतानाच आगीचे लोळ फेकणारी शस्त्रे डागली. शहीद झालेल्या १७ जवानांपैकी १३-१४ जणांचा मृत्यू ते झोपलेल्या तंबूंना लागलेल्या आगीमुळे झाला. प्राणाहुती दिलेले बहुतांश जवान १० डोगरा आणि ६ बिहार रेजिमेंटचे होते. १९ जखमी जवानांना हेलिकॉप्टरने श्रीनगर येथील लष्कराच्या बेस इस्पितळात हलविण्यात आले.>चार एके-४७, रॉकेट लॉन्चर्स या हल्ल्याविषयी प्रसिद्धिमाध्यमांना माहिती देताना लष्कराचे डायरेक्टर जनरल आॅफ मिलिटरी आॅपरेशन्स (डीजीएमओ) लेफ्ट. जनरल रणबीर सिंग म्हणाले की, हे हल्लेखोर परकीय होते. यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची आमची प्राथमिक माहिती आहे. लष्कराने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत जे चार हल्लेखोर ठार झाले त्यांच्याकडे चार एके-४७ रायफल, अंडर बॅरेल रॉकेट लॉन्चर्स आणि अन्य प्रकारचे युद्धसाहित्य मिळाले. या सर्व शस्त्रांवर पाकिस्तानची मार्किंग्ज् आहेत. (म्हणजेच ही शस्त्रे पाकिस्तानी बनावटीची आहेत.)पाक म्हणतो, आमच्या माथी खापर नकोपाकिस्तानने मात्र या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नाही. जरा काही खुट्ट झाले की कोणतीही शहानिशा न करता आमच्या माथी खापर फोडण्याची भारताला खोड जडली आहे, असा कांगावा करून हात वर केले.