शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

‘भारत माता की जय’ न म्हणणारे पाकिस्तानी!, भाजपा आमदाराचे उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:51 IST

भारत माता की जय न म्हणणा-यांना तर राजकारणात प्रवेशच करू द्यायला नको. ज्या लोकांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात मनात काही किंतू असेल, तर ते...

बलिया (उत्तर प्रदेश) : ‘भारत माता की जय’ जे म्हणणार नाहीत ते पाकिस्तानी आहेत, असे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी सोमवारी येथे म्हटले.बैरिया मतदार संघातून निवडून आलेले सुरेंद्र सिंह यांनीच काही दिवसांपूर्वी भारत २०२४ पर्यंत हिंदू राष्ट्र बनेल, असे जाहीर केले होते. रातसाद येथील कार्यक्रमात सुरेंद्र सिंह म्हणाले की, भारत माता की जय न म्हणणा-यांना तर राजकारणात प्रवेशच करू द्यायला नको. ज्या लोकांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात मनात काही किंतू असेल, तर ते पाकिस्तानी असून देशात राहण्याचा त्यांना हक्क नाही. जे लोक आपल्या मातृभूमीला आईचा दर्जा देत नाहीत, त्यांची देशभक्ती संशयास्पद आहे. ज्यांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचणी आहेत, त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचीच परवानगी असू नये, असेही त्यांनी म्हटले. बल्लिया येथे १४ जानेवारी रोजी बोलताना सिंह म्हणाले होते की, एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की, जे हिंदू संस्कृतीशी एकरूप होतील, तेच मुस्लीम या देशात राहतील. फारच थोडे मुस्लीम हे देशभक्त आहेत. एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की, जे मुस्लीम आमच्या संस्कृतीशी एकरूप होतील, ते भारतात राहतील. सुरेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवतारी पुरुष अशा शब्दांत वर्णन केले व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला केला. (वृत्तसंस्था)पोलिसांना थप्पड माराबेकायदा खाणकामाबद्दल बोलताना सुरेंद्र सिंह यांनी असा सल्ला दिला की, खासगी कामासाठी वाळू घेताना कुणा पोलिसांनी अडवले, तर त्यांना सरळ दोन थपडी मारा.

टॅग्स :BJPभाजपा