शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी वृत्तपत्रातील 'सर्जिकल स्ट्राईक'ची बातमी निराधार

By admin | Updated: October 14, 2016 12:58 IST

पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी जर्मनीचे राजदूत यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.14 - उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानने धसका घेतल्याचे दिसत आहे. तसेच भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झाल्याचेही पाकिस्तान वारंवार नाकारत आहे. आता पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीमध्ये जर्मनीचे राजदूत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितले', अशी बातमी छापून पाकिस्तानने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक न झाल्याचा कागांवा केला आहे. 
 
दरम्यान, ही बातमी कथित आणि निराधार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्पष्ट केले आहे. '29 सप्टेंबर रोजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी अन्य देशांच्या राजदूतांना भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत माहिती दिली, त्यावेळी जर्मनीचे राजदूत देखील उपस्थित होते. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकविषयी कोणतीही चर्चा झाली नाही'. असेही स्पष्ट करण्यात आले असून भारताने पाकिस्तानी मीडियाने छापलेले कथित वृत्त फेटाळून लावले आहे. 
आणखी बातमी 
पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, 'भारताचे परराष्ट्र सचिव यांनी स्पष्ट शब्दांत भारतीय सैन्यांनी पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले नाही' अशी कथिक आणि खोटी बातमी सूत्रांची माहिती देत छापली होती. 
दरम्यान, डॉन वृत्तपत्रात, पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने पाकिस्तानच्या सरकारने तेथील लष्कराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे, अशी बातमी पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. त्यानंतर 'द न्यूज इंटरनॅशनल'ने ही कथित आणि निराधार बातमी छापली आहे.
उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, सीमारेषेजवळ भारताकडून केवळ गोळीबार करण्यात आल्याचे सांगत सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे पाकिस्तानने नाकारले आहे.