शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

पाकिस्तानी वृत्तपत्रातील 'सर्जिकल स्ट्राईक'ची बातमी निराधार

By admin | Updated: October 14, 2016 12:58 IST

पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी जर्मनीचे राजदूत यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.14 - उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानने धसका घेतल्याचे दिसत आहे. तसेच भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झाल्याचेही पाकिस्तान वारंवार नाकारत आहे. आता पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीमध्ये जर्मनीचे राजदूत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितले', अशी बातमी छापून पाकिस्तानने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक न झाल्याचा कागांवा केला आहे. 
 
दरम्यान, ही बातमी कथित आणि निराधार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्पष्ट केले आहे. '29 सप्टेंबर रोजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी अन्य देशांच्या राजदूतांना भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत माहिती दिली, त्यावेळी जर्मनीचे राजदूत देखील उपस्थित होते. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकविषयी कोणतीही चर्चा झाली नाही'. असेही स्पष्ट करण्यात आले असून भारताने पाकिस्तानी मीडियाने छापलेले कथित वृत्त फेटाळून लावले आहे. 
आणखी बातमी 
पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, 'भारताचे परराष्ट्र सचिव यांनी स्पष्ट शब्दांत भारतीय सैन्यांनी पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले नाही' अशी कथिक आणि खोटी बातमी सूत्रांची माहिती देत छापली होती. 
दरम्यान, डॉन वृत्तपत्रात, पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने पाकिस्तानच्या सरकारने तेथील लष्कराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे, अशी बातमी पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. त्यानंतर 'द न्यूज इंटरनॅशनल'ने ही कथित आणि निराधार बातमी छापली आहे.
उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, सीमारेषेजवळ भारताकडून केवळ गोळीबार करण्यात आल्याचे सांगत सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे पाकिस्तानने नाकारले आहे.