शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भारतामध्येही झालं होतं ट्रेनचं अपहरण, प्रवाशांना धरलं होतं ओलीस, अखेरीस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 21:01 IST

Pakistan Train Hijack: पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी एका प्रवासी ट्रेनचं अपहरण केल्याने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारतामध्येही अशा प्रकारे काही वेळा प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचं अपहरण झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी एका प्रवासी ट्रेनचं अपहरण केल्याने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. तसेच दहशतवाद्यांनी ओलीस धरलेल्या प्रवाशांमध्ये पाकिस्तानी लष्करातील सैनिक आणि अधिकारी असल्याने पाकिस्तान सरकराच्या तोंडचं पाणी पळालं आहे. दरम्यान, ट्रेनचं अपहरण होण्याची ही काही पहिलीच घटना नाही आहे. भारतामध्येही अशा प्रकारे काही वेळा प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचं अपहरण झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

यातील एक घटना ६ फेब्रुवारी २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी मुंबई-हावडा मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचं अपहरण झालं होतं. या अपहरणाचा उद्देश जयचंद वैद्य अपहरणकांडातील आरोपी उपेंद्र सिंह उर्फ कबरा याची सुटका करणं हा होता. २००१ मध्ये व्यापारी जयचंद वैद्य यांच्या झालेल्या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांनी उपेंद्र सिंह उर्फ कबरा याला मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. तुरुंगातून फरार झालेल्या काबरा याने जनशताब्दी एक्स्प्रेसला जवळपास १३ किलोमीटरपर्यंत ओलीस धरले होते. अखेर लष्कराच्या मदतीने ट्रेनमधून प्रवासांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.

सन २००९ मध्ये सशस्त्र माओवाद्यांनी  भुवनेश्वर-राजधानी एक्स्प्रेसचं अपहणर केलं होतं. तेव्हा सुमारे ३०० ते ४०० माओवाद्यांनी संपूर्ण ट्रेनच ताब्यात ठेवली होती. शेकडो प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी हे अनेक तासांपर्यंत ताब्यात राहिले होते. या अपहरणकांडांमध्ये छत्रधर नावाच्या माओवाद्याचं नाव समोर आलं होतं. त्याच्या इशाऱ्यावर हे अपहरणकांड घडवण्यात आलं होतं. माओवादी नेत्याच्या सुटकेसाठी  प्रवाशांना ओलीस धरण्यात आलं होतं. यादरम्यान, प्रवशांना मारहाण करून लुटालूट करण्यात आली होती.

तर जून २०१३ मध्ये माओवाद्यांनी बिहारमधील जमुई येथे गोळीबार करून ट्रेनवर ताबा मिळवला होता. तेव्हा धनबाद-पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेसला अनेक तासांपर्यंत अपहरण करून ताब्यात ठेवले होते. माओवाद्यांना ड्रायव्हरला ओलीस धरत संपूर्ण ट्रेनवर ताबा मिळवला होता. त्यानंतर त्यांनी प्रवाशांची लुटालूट केली होती.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारी