शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पाकिस्तानला उपरती; म्हणे, ‘शस्त्रसंधी’ नक्की पाळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 04:33 IST

महिनाभरात पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागल्यानंतर

नवी दिल्ली : महिनाभरात पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागल्यानंतर अखेर दोन्ही देशांना शस्त्रसंधी कराराची आठवण झाली आहे. पाच महिन्यांत १,०५०वेळा गोळीबार करणाºया पाकिस्तानला उपरती असून, आता ‘शस्त्रसंधी’ नक्की पाळणार, असल्याचे हॉटलाइन चर्चेत मान्य केले आहे.दोन्ही देशांच्या लष्करी मोहिमविषयक विभागाच्या महासंचालकांची (डीजीएमओ) मंगळवारी विशेष हॉटलाइनवर चर्चा झाली. त्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याबाबत २००३ साली झालेल्या कराराचे यापुढे काटेकोर पालन करण्याचा निर्णय झाला.गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने लष्करी चौक्यांबरोबरच सीमेलगतच्या गावांवरही तोफगोळ््यांचा जोरदार मारा केला होता. त्यात अनेक सुरक्षा जवान शहीद झाले व नागरिकही मारले गेले होते. त्याला भारताने तेवढेच चोख प्रत्युत्तर दिले होते.२०१७ मध्ये अतिरेकी बुºहान वाणी भारताकडून मारला गेल्यानंतर पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचे सर्वाधिक उल्लंघन झाले होते. त्या वर्षात पाकिस्तानकडून १९७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. २०१८ मध्ये पाच महिन्यात पाकिस्तानाने १०५० वेळा शस्त्रसंधी मोडली.२००१ मध्ये भारताच्या संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उद््भवलेल्या तणावानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली होती. २००३ साली दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांततेसाठी शस्त्रसंधी करार करण्यात आला होता.पाकने केली होती विनंतीदोन्ही देशांतील तणावही वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान व पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्यात झालेल्या चर्चेत जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्षनियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीचा आढावा घेण्यात आला. या चर्चेसाठी पाकिस्तानने भारताला विनंती केली होती.