शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

आॅपरेशन प्लॅनसह पाकिस्तान सज्ज!

By admin | Updated: September 24, 2016 05:42 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता पाकिस्तान सैन्य आॅपरेशनसाठी सज्ज झाले आहे

नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता पाकिस्तान सैन्य आॅपरेशनसाठी सज्ज झाले आहे. भारतातील लक्ष्यही त्यांनी निश्चित केले आहे. जिओ टीव्हीने सांगितले की, सीमेपलीकडील आक्रमक कारवाईसाठी तयारी करण्यात आली आहे. सैन्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार आहे. भारताच्या कोणत्याही सैन्य आव्हानाला तोंड देण्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. आॅपरेशन प्लॅन तयार आहे. लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सैन्याना हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारताला आपल्या क्षमतांची पूर्ण जाणीव आहे, तर पाकिस्तान सीमेपलीकडच्या आव्हानांचा सामना कशाप्रकारे करू शकतो, याचीही जाणीव आहे. भारताकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला कसे तोंड द्यायचे, याची तयारी पाकिस्तानने केली आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. यात १८ जवान शहीद झाले, तर भारताने पाकिस्तानच्या चार अतिरेक्यांना ठार मारले होते. भारताकडून मर्यादित, पण दंडात्मक कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. थेट युद्धाचा पर्याय जरी निवडला नाही तरी सीमापार दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले जाऊ शकतात. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शब्द दिला आहे की, उरीतील हल्लेखोरांवर निश्चित कारवाई केली जाईल. पाकिस्तानने उत्तर भागात नो फ्लाय झोन जाहीर केला आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानातील एका पत्रकाराने टिष्ट्वट करून सांगितले होते की, इस्लामाबादवर एफ १६ विमाने घिरट्या घालत आहेत. कदाचित, हा सराव असल्याचे सांगितले जात आहे. (वृत्तसंस्था)>रशियन लष्कराचा पाकिस्तानात सरावरशियन लष्कराच्या यंत्रसज्ज पायदळ तुकडीचे शुक्रवारी पाकिस्तानात संयुक्त लष्करी सरावासाठी आगमन झाले. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या सरावाला ‘मैत्री-२०१६’ असे नाव देण्यात आले असून अशा प्रकारचा सराव हा प्रथमच होत आहे. शीतयुद्धाच्या काळात रशिया आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शत्रू होते आता मात्र उभयतांत लष्करी सहकार्य वाढताना दिसत आहे.>विमानाचे लँडिंग रस्त्यावरत्या पाठोपाठ हवाई दलाच्या विमानाचे लॅडिंग करण्यासाठी पाकिस्तानमधील मुख्य हायवे बंद ठेवण्यात आले होते, असे वृत्त आले आहे. उरी हल्ल्यानंतर परिस्थिती चिघळल्याने हा सराव करण्यात येत नसून, नियमित प्रशिक्षणाचा भाग असल्याने लॅडिंगचा सराव करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांच्या या सरावासाठी इस्लामाबाद ते लाहोरदरम्यानची वाहतूकही जुन्या रस्त्याने वळवण्यात आली होती. धावपट्या खराब झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून हायवेंवर लॅडिंगचा सराव केला जात आहे. गेली अनेक वर्ष हा सराव करत आहोत, असे पाकिस्तान हवाई दलाचे प्रवक्ते जावेद मोहम्मद अली यांनी सांगितले. उरी हल्ल्यानंतर भारत हल्ला करेल. या भीतीने आम्ही हा सराव करत नाही आहोत. हल्ला आणि सरावाची वेळ एकत्र येणे हा योगायोग आहे, असेही जावेद मोहम्मद अली म्हणाले.