शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

''पाकव्याप्त काश्मीर आमचेच; एक दिवस ताब्यात येईलच''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 06:34 IST

पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे. हे पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले. मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी असेही सांगितले की, दहशतवाद बंद झाल्याखेरीज पाकिस्तानशी कोणतीही बोलणी होणार नाहीत आणि जेव्हा केव्हा बोलणी होतील, तेव्हा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दलच असतील. हे या आधीही अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे.आम्ही चर्चेचा प्रस्ताव दिला होता, पण भारताने तो अव्हेरला, असे पाकिस्तान म्हणते. त्याविषयी विचारता परराष्ट्रमंत्री म्हणाले की, कोणतीही कृती न करता ते फक्त बोलतात हीच खरी समस्या आहे. भारताची भूमिका अवाजवी किंवा जगावेगळी मुळीच नाही. शेजारी देश आपल्याविरुद्ध कितीही उचापती करत असला तरी त्याच्याशी चर्चा करणारा एकही देश जगात तुम्हाला सापडणार नाही. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल कोण काय बोलते याची आम्ही चिंता करत नाही. अमेरिका व भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत. संबंध जसे दृढ होतात तसे काही मुद्देही समोर येतात. त्या मुद्द्यांवर अमेरिकेशी चर्चा करून तोडगा काढू असेही जयशंकर म्हणाले.डॉ. नाईक भारतास हवेच आहेतअतिरेकी कारवायांना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून खटले सुरू असलेले वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हे भारतास नक्कीच हवे आहेत व त्यांच्या प्रत्यार्पणासाठीही भारत आग्रही आहे असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. डॉ. नाईक यांचे वास्तव्य सध्या मलेशियात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वीच भेट झाली पण डॉ. नाईक यांच्या प्रत्यार्पणाविषयी त्यांनी काही विषय काढला नाही. नाईक यांना स्वीकारायला कोणताच देश तयार नाही. त्यामुळे त्यांचे प्रत्यार्पण करायचे म्हटले तरी त्यांना पाठवायचे कुठे असा प्रश्न असल्याचे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांनी केले आहे. याचे ठाम खंडन जयशंकर यांनी केले. रशियात मोदी महाथीर यांना भेटले तेव्हा नाईक यांच्या प्रत्यार्पणाचा विषय निघाला होता व ते भारताला हवे आहेत असे स्पष्ट केले होते असे जयशंकर म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर