शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

''पाकव्याप्त काश्मीर आमचेच; एक दिवस ताब्यात येईलच''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 06:34 IST

पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे. हे पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले. मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी असेही सांगितले की, दहशतवाद बंद झाल्याखेरीज पाकिस्तानशी कोणतीही बोलणी होणार नाहीत आणि जेव्हा केव्हा बोलणी होतील, तेव्हा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दलच असतील. हे या आधीही अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे.आम्ही चर्चेचा प्रस्ताव दिला होता, पण भारताने तो अव्हेरला, असे पाकिस्तान म्हणते. त्याविषयी विचारता परराष्ट्रमंत्री म्हणाले की, कोणतीही कृती न करता ते फक्त बोलतात हीच खरी समस्या आहे. भारताची भूमिका अवाजवी किंवा जगावेगळी मुळीच नाही. शेजारी देश आपल्याविरुद्ध कितीही उचापती करत असला तरी त्याच्याशी चर्चा करणारा एकही देश जगात तुम्हाला सापडणार नाही. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल कोण काय बोलते याची आम्ही चिंता करत नाही. अमेरिका व भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत. संबंध जसे दृढ होतात तसे काही मुद्देही समोर येतात. त्या मुद्द्यांवर अमेरिकेशी चर्चा करून तोडगा काढू असेही जयशंकर म्हणाले.डॉ. नाईक भारतास हवेच आहेतअतिरेकी कारवायांना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून खटले सुरू असलेले वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हे भारतास नक्कीच हवे आहेत व त्यांच्या प्रत्यार्पणासाठीही भारत आग्रही आहे असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. डॉ. नाईक यांचे वास्तव्य सध्या मलेशियात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वीच भेट झाली पण डॉ. नाईक यांच्या प्रत्यार्पणाविषयी त्यांनी काही विषय काढला नाही. नाईक यांना स्वीकारायला कोणताच देश तयार नाही. त्यामुळे त्यांचे प्रत्यार्पण करायचे म्हटले तरी त्यांना पाठवायचे कुठे असा प्रश्न असल्याचे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांनी केले आहे. याचे ठाम खंडन जयशंकर यांनी केले. रशियात मोदी महाथीर यांना भेटले तेव्हा नाईक यांच्या प्रत्यार्पणाचा विषय निघाला होता व ते भारताला हवे आहेत असे स्पष्ट केले होते असे जयशंकर म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर