शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात अतिरेकी घुसवण्यासाठी पाकच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:48 IST

सुरक्षा यंत्रणा सतर्क

जम्मू : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या कारवाया गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. पाकिस्तानात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या तळांमध्ये नेहमीपेक्षा अधिक संख्येने दहशतवादी जमा झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी दिली.ते म्हणाले की, घुसखोरीच्या प्रयत्नांबरोबरच पाकिस्तानी लष्कर शस्त्रसंधीचेही वारंवार उल्लंघन करीत आहे. ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी रणबीरसिंग यांनी वरिष्ठ लष्करी व गुप्तचर अधिकाऱ्यांची श्रीनगरमध्ये बैठक घेतली. यासंदर्भात उधमपूर येथील लष्करी अधिकाºयांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काश्मीरमध्ये शांतता टिकून राहावी यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी लष्करी अधिकाºयांना दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तान गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांद्वारे खोट्या माहितीचा प्रसार करीत आहे. या अफवांना बळी पडू नका, असे आवाहनही रणबीरसिंग यांनी केले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराचा भडका उडू नये म्हणून भारतीय लष्कर अत्यंत सतर्क असल्याचेही त्यांनी सांगितले.काश्मीरमध्ये शांतता३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मंजूर झाला. इतक्या मोठ्या घडामोडीनंतरही काश्मीरमध्ये शांतता असल्याचा दावा तेथील पोलिसांनी केला आहे. रविवारी काश्मीरमध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले होते. सोमवारी ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना स्थानबद्ध केले आहे.राज्यातील लँडलाईन, मोबाईल, इंटरनेट सेवा काही काळापुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग म्हणाले की, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती संपूर्ण नियंत्रणाखाली आहे. किश्तवार, राजौरी भागामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द करण्याच्या निषेधार्थ कारगिलमध्ये संयुक्त कृती समितीने बंदची हाक दिली होती. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील स्थितीचा सोमवारी एका बैठकीत आढावा घेतला.370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक कारवाया केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांनी अतिशय सतर्क राहायला हवे, असे माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी म्हटले आहे. काश्मीरबाबत सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Pakistanपाकिस्तान