शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात अतिरेकी घुसवण्यासाठी पाकच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:48 IST

सुरक्षा यंत्रणा सतर्क

जम्मू : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या कारवाया गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. पाकिस्तानात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या तळांमध्ये नेहमीपेक्षा अधिक संख्येने दहशतवादी जमा झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी दिली.ते म्हणाले की, घुसखोरीच्या प्रयत्नांबरोबरच पाकिस्तानी लष्कर शस्त्रसंधीचेही वारंवार उल्लंघन करीत आहे. ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी रणबीरसिंग यांनी वरिष्ठ लष्करी व गुप्तचर अधिकाऱ्यांची श्रीनगरमध्ये बैठक घेतली. यासंदर्भात उधमपूर येथील लष्करी अधिकाºयांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काश्मीरमध्ये शांतता टिकून राहावी यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी लष्करी अधिकाºयांना दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तान गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांद्वारे खोट्या माहितीचा प्रसार करीत आहे. या अफवांना बळी पडू नका, असे आवाहनही रणबीरसिंग यांनी केले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराचा भडका उडू नये म्हणून भारतीय लष्कर अत्यंत सतर्क असल्याचेही त्यांनी सांगितले.काश्मीरमध्ये शांतता३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मंजूर झाला. इतक्या मोठ्या घडामोडीनंतरही काश्मीरमध्ये शांतता असल्याचा दावा तेथील पोलिसांनी केला आहे. रविवारी काश्मीरमध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले होते. सोमवारी ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना स्थानबद्ध केले आहे.राज्यातील लँडलाईन, मोबाईल, इंटरनेट सेवा काही काळापुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग म्हणाले की, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती संपूर्ण नियंत्रणाखाली आहे. किश्तवार, राजौरी भागामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द करण्याच्या निषेधार्थ कारगिलमध्ये संयुक्त कृती समितीने बंदची हाक दिली होती. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील स्थितीचा सोमवारी एका बैठकीत आढावा घेतला.370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक कारवाया केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांनी अतिशय सतर्क राहायला हवे, असे माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी म्हटले आहे. काश्मीरबाबत सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Pakistanपाकिस्तान