शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

काश्मिरात अतिरेकी घुसवण्यासाठी पाकच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:48 IST

सुरक्षा यंत्रणा सतर्क

जम्मू : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या कारवाया गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. पाकिस्तानात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या तळांमध्ये नेहमीपेक्षा अधिक संख्येने दहशतवादी जमा झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी दिली.ते म्हणाले की, घुसखोरीच्या प्रयत्नांबरोबरच पाकिस्तानी लष्कर शस्त्रसंधीचेही वारंवार उल्लंघन करीत आहे. ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी रणबीरसिंग यांनी वरिष्ठ लष्करी व गुप्तचर अधिकाऱ्यांची श्रीनगरमध्ये बैठक घेतली. यासंदर्भात उधमपूर येथील लष्करी अधिकाºयांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काश्मीरमध्ये शांतता टिकून राहावी यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी लष्करी अधिकाºयांना दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तान गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांद्वारे खोट्या माहितीचा प्रसार करीत आहे. या अफवांना बळी पडू नका, असे आवाहनही रणबीरसिंग यांनी केले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराचा भडका उडू नये म्हणून भारतीय लष्कर अत्यंत सतर्क असल्याचेही त्यांनी सांगितले.काश्मीरमध्ये शांतता३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मंजूर झाला. इतक्या मोठ्या घडामोडीनंतरही काश्मीरमध्ये शांतता असल्याचा दावा तेथील पोलिसांनी केला आहे. रविवारी काश्मीरमध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले होते. सोमवारी ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना स्थानबद्ध केले आहे.राज्यातील लँडलाईन, मोबाईल, इंटरनेट सेवा काही काळापुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग म्हणाले की, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती संपूर्ण नियंत्रणाखाली आहे. किश्तवार, राजौरी भागामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द करण्याच्या निषेधार्थ कारगिलमध्ये संयुक्त कृती समितीने बंदची हाक दिली होती. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील स्थितीचा सोमवारी एका बैठकीत आढावा घेतला.370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक कारवाया केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांनी अतिशय सतर्क राहायला हवे, असे माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी म्हटले आहे. काश्मीरबाबत सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Pakistanपाकिस्तान