शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पाकच्या हालचाली वाढल्या; LOC जवळ सैनिकांच्या तुकड्या केल्या तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 16:50 IST

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे.

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात कुटनीतीचा अवलंब करत आहे. मात्र, चीनशिवाय कोणताही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यातच पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेवर नापाक हरकती करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर 2000पेक्षा जास्त सैनिकांना तैनात केल्याचे समोर आले आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने एलओसीच्या बाग आणि कोतली सेक्टरजवळील पाकव्याप्त काश्मीरमध्ये 2000पेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने सध्यातरी सैनिक आक्रमक जागेवर तैनात केले नाहीत, परंतु आमची पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर बारीक नजर असल्याचे भारतीय लष्करांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना स्थानिक व अफगाणी तरुणांना दहशतवादी होण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा घेऊन गेले. मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकला पाठिंबा दिला नाही. त्यानंतर जगभरात भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. फेक न्यूज, बनावट व्हिडीओ शेअर करत काश्मीरवरून भारताला टार्गेट केलं. यावरूनही हातात काहीच लागत नसल्याने भारताला अण्वस्त्र युद्धाची पोकळ धमकीही देऊन झाली. मात्र आता पाकिस्तानला भारतासमोर झुकण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान