शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पाकच्या हालचाली वाढल्या; LOC जवळ सैनिकांच्या तुकड्या केल्या तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 16:50 IST

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे.

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात कुटनीतीचा अवलंब करत आहे. मात्र, चीनशिवाय कोणताही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यातच पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेवर नापाक हरकती करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर 2000पेक्षा जास्त सैनिकांना तैनात केल्याचे समोर आले आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने एलओसीच्या बाग आणि कोतली सेक्टरजवळील पाकव्याप्त काश्मीरमध्ये 2000पेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने सध्यातरी सैनिक आक्रमक जागेवर तैनात केले नाहीत, परंतु आमची पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर बारीक नजर असल्याचे भारतीय लष्करांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना स्थानिक व अफगाणी तरुणांना दहशतवादी होण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा घेऊन गेले. मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकला पाठिंबा दिला नाही. त्यानंतर जगभरात भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. फेक न्यूज, बनावट व्हिडीओ शेअर करत काश्मीरवरून भारताला टार्गेट केलं. यावरूनही हातात काहीच लागत नसल्याने भारताला अण्वस्त्र युद्धाची पोकळ धमकीही देऊन झाली. मात्र आता पाकिस्तानला भारतासमोर झुकण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान