शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:20 IST

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा विकास दिव्यकीर्ती यांनी उल्लेख केला.

मंगळवारी जम्मू-काश्मीरधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील संबंध बिघडले. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अनेक भारतीयांनी या विरोधात लष्करी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामध्ये डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ते यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत-पाकिस्तान याच्याील संबंधावर मार्गदर्शन करत आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवरही चर्चा केली.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात

विकास दिव्यकीर्ती यांनीही या दहशतवादी घटनेत जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांचा हात असल्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, कोणी स्वतःचे पाय कुऱ्हाडीने का कापेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचा थेट परिणाम तेथील पर्यटनावर होईल. याचा थेट परिणाम काश्मिरी लोकांच्या उत्पन्नावर होईल. तिथे पूर्वी २०-२२ लाख पर्यटक येत होते, तिथे आता २-२.५ कोटी लोक येत आहेत.

विकास दिव्यकीर्ती म्हणाले की, आजकाल पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. यादवी युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करू शकते. 'पाकिस्तानची सध्याची अवस्था वाईट आहे. बलुचिस्तान कधीही घडू शकते. एकाच वेळी २-३ बाळांचा जन्म होण्याची शक्यता आहे. ही बातमी कधीही येऊ शकते. तिथे ट्रेनचे अपहरण होते यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. जगभरात त्यांचे नाव खराब झाले आहे. त्यांना हे प्रकरण दाबायचे आहे, म्हणूनच ते अशा गोष् घडवून आणत आहेत, असंही विकास दिव्यकीर्ती म्हणाले.

 पाकिस्तानचे दोन, तीन भाग होणार

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा उल्लेख करत विकास दिव्यकीर्ती म्हणाले, जर परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात पाकिस्तानचे अनेक भाग होऊ शकतात. विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती असहाय्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, तेथील सामान्य नागरिक महागाई, अस्थिरता आणि दहशतवादाने त्रस्त आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत