शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:20 IST

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा विकास दिव्यकीर्ती यांनी उल्लेख केला.

मंगळवारी जम्मू-काश्मीरधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील संबंध बिघडले. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अनेक भारतीयांनी या विरोधात लष्करी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामध्ये डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ते यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत-पाकिस्तान याच्याील संबंधावर मार्गदर्शन करत आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवरही चर्चा केली.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात

विकास दिव्यकीर्ती यांनीही या दहशतवादी घटनेत जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांचा हात असल्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, कोणी स्वतःचे पाय कुऱ्हाडीने का कापेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचा थेट परिणाम तेथील पर्यटनावर होईल. याचा थेट परिणाम काश्मिरी लोकांच्या उत्पन्नावर होईल. तिथे पूर्वी २०-२२ लाख पर्यटक येत होते, तिथे आता २-२.५ कोटी लोक येत आहेत.

विकास दिव्यकीर्ती म्हणाले की, आजकाल पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. यादवी युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करू शकते. 'पाकिस्तानची सध्याची अवस्था वाईट आहे. बलुचिस्तान कधीही घडू शकते. एकाच वेळी २-३ बाळांचा जन्म होण्याची शक्यता आहे. ही बातमी कधीही येऊ शकते. तिथे ट्रेनचे अपहरण होते यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. जगभरात त्यांचे नाव खराब झाले आहे. त्यांना हे प्रकरण दाबायचे आहे, म्हणूनच ते अशा गोष् घडवून आणत आहेत, असंही विकास दिव्यकीर्ती म्हणाले.

 पाकिस्तानचे दोन, तीन भाग होणार

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा उल्लेख करत विकास दिव्यकीर्ती म्हणाले, जर परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात पाकिस्तानचे अनेक भाग होऊ शकतात. विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती असहाय्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, तेथील सामान्य नागरिक महागाई, अस्थिरता आणि दहशतवादाने त्रस्त आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत