शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:20 IST

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा विकास दिव्यकीर्ती यांनी उल्लेख केला.

मंगळवारी जम्मू-काश्मीरधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील संबंध बिघडले. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अनेक भारतीयांनी या विरोधात लष्करी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामध्ये डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ते यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत-पाकिस्तान याच्याील संबंधावर मार्गदर्शन करत आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवरही चर्चा केली.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात

विकास दिव्यकीर्ती यांनीही या दहशतवादी घटनेत जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांचा हात असल्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, कोणी स्वतःचे पाय कुऱ्हाडीने का कापेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचा थेट परिणाम तेथील पर्यटनावर होईल. याचा थेट परिणाम काश्मिरी लोकांच्या उत्पन्नावर होईल. तिथे पूर्वी २०-२२ लाख पर्यटक येत होते, तिथे आता २-२.५ कोटी लोक येत आहेत.

विकास दिव्यकीर्ती म्हणाले की, आजकाल पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. यादवी युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करू शकते. 'पाकिस्तानची सध्याची अवस्था वाईट आहे. बलुचिस्तान कधीही घडू शकते. एकाच वेळी २-३ बाळांचा जन्म होण्याची शक्यता आहे. ही बातमी कधीही येऊ शकते. तिथे ट्रेनचे अपहरण होते यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. जगभरात त्यांचे नाव खराब झाले आहे. त्यांना हे प्रकरण दाबायचे आहे, म्हणूनच ते अशा गोष् घडवून आणत आहेत, असंही विकास दिव्यकीर्ती म्हणाले.

 पाकिस्तानचे दोन, तीन भाग होणार

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा उल्लेख करत विकास दिव्यकीर्ती म्हणाले, जर परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात पाकिस्तानचे अनेक भाग होऊ शकतात. विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती असहाय्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, तेथील सामान्य नागरिक महागाई, अस्थिरता आणि दहशतवादाने त्रस्त आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत