शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'गिलगिट बाल्टिस्तान भारताचाच भाग; पीओके पूर्णपणे दहशतवाद्यांच्या नियंत्रणात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 20:40 IST

जम्मू-काश्मीर अशांत करण्याचे प्रयत्न सफल होणार नाहीत- लष्करप्रमुख

श्रीनगर: जम्मू-काश्मीर अशांत करण्याचा पाकिस्तानचा डाव कधीही यशस्वी ठरणार नाही, असं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून भारत त्या भागाच्या विकासाचं लक्ष्य गाठेल, असंदेखील ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानी प्रशासनाच्या नव्हे, तर दहशतवाद्यांच्या नियंत्रणात असल्याचं लष्करप्रमुख रावत यांनी म्हटलं.पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ नये, या भागाचा विकास होऊ नये यासाठी दहशतवाद्यांकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. त्यामुळेच काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यांचा जळफळाट झाला, असं लष्करप्रमुख म्हणाले. पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तान जम्मू-काश्मीरचा भाग आहेत. मात्र तो सध्या पश्चिमेकडच्या शेजाऱ्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी या भागावर अवैध कब्जा केला आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. जम्मू-काश्मीरमध्ये पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानचादेखील समावेश होतो. या भागावर सध्या पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे. पीओकेतील दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते कधी बाहेरील राज्यांमधून आलेल्या सफरचंदांच्या व्यापाऱ्यांच्या हत्या घडवतात, तर कधी दुकानं उघडू नये यासाठी धमक्या दिल्या जातात. इतकंच काय विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये यासाठीदेखील ते प्रयत्न करतात. दहशतवाद्यांच्या पाठिंब्यानं या सगळ्या कारवाया केल्या जातात, असं लष्करप्रमुख एका कार्यक्रमात म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीBipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान