शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

'गिलगिट बाल्टिस्तान भारताचाच भाग; पीओके पूर्णपणे दहशतवाद्यांच्या नियंत्रणात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 20:40 IST

जम्मू-काश्मीर अशांत करण्याचे प्रयत्न सफल होणार नाहीत- लष्करप्रमुख

श्रीनगर: जम्मू-काश्मीर अशांत करण्याचा पाकिस्तानचा डाव कधीही यशस्वी ठरणार नाही, असं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून भारत त्या भागाच्या विकासाचं लक्ष्य गाठेल, असंदेखील ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानी प्रशासनाच्या नव्हे, तर दहशतवाद्यांच्या नियंत्रणात असल्याचं लष्करप्रमुख रावत यांनी म्हटलं.पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ नये, या भागाचा विकास होऊ नये यासाठी दहशतवाद्यांकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. त्यामुळेच काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यांचा जळफळाट झाला, असं लष्करप्रमुख म्हणाले. पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तान जम्मू-काश्मीरचा भाग आहेत. मात्र तो सध्या पश्चिमेकडच्या शेजाऱ्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी या भागावर अवैध कब्जा केला आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. जम्मू-काश्मीरमध्ये पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानचादेखील समावेश होतो. या भागावर सध्या पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे. पीओकेतील दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते कधी बाहेरील राज्यांमधून आलेल्या सफरचंदांच्या व्यापाऱ्यांच्या हत्या घडवतात, तर कधी दुकानं उघडू नये यासाठी धमक्या दिल्या जातात. इतकंच काय विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये यासाठीदेखील ते प्रयत्न करतात. दहशतवाद्यांच्या पाठिंब्यानं या सगळ्या कारवाया केल्या जातात, असं लष्करप्रमुख एका कार्यक्रमात म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीBipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान