शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

काश्मीरवर बोलायचा पाकला अधिकारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 04:57 IST

राजनाथसिंह; भारतात घातपाती कारवाया करणे थांबवा

लेह : काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून, त्याविषयी बोलायचा पाकिस्तानला काडीचाही अधिकार नाही असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ठणकावले आहे. येथे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (डीआरडीओ) या संस्थेतर्फे गुरुवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.काश्मीर पाकिस्तानचे होते कधी की ते या प्रदेशाबद्दल इतके अश्रू ढाळत आहेत असाही सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर एक देश म्हणून त्याचा भारताने नेहमीच आदर केला आहे. पाकिस्तानशी आम्हाला उत्तम संबंध हवे आहेत. मात्र त्याआधी भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचे पाकिस्तानने थांबविले पाहिजे.

मोदी सरकारने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्या निर्णयानंतर राजनाथसिंह लेहमध्ये पहिल्यांदाच आले होते. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचे गेल्या काही दिवसांत अनेक प्रयत्न केले. पण त्याची इतर देशांनी गंभीर दखल घेतली नाही. लडाखमधील सुरक्षा व्यवस्थेचा राजनाथसिंह यांनी या दौऱ्यामध्ये आढावा घेतला. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी हक्कांची जी गळचेपी सुरू आहे, त्याबद्दल पाकिस्ताननेबोलले पाहिजे. काश्मीर प्रश्नाबाबत कोणताही देश पाकिस्तानसोबत नाही. ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे आपण अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क इस्पेर यांना दूरध्वनीवरील संभाषणात सांगितल्याचेही राजनाथसिंहम्हणाले. (वृत्तसंस्था)राजनाथसिंह लडाखमध्येसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी लडाख येथील ‘किसान विज्ञान मेळ्या’ला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘डीआरडीओ’च्या फार्ममध्येही पाहणी केली.बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानाकाश्मीरवर काहीही हक्क नसताना पाकिस्तान सध्या बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा रीतीने वागत आहे.लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन तेथील स्थानिक नागरिकांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे.३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीर, लडाखच्या विकासातील मोठा अडथळा दूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Article 370कलम 370ladakhलडाख