शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

काश्मीरवर बोलायचा पाकला अधिकारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 04:57 IST

राजनाथसिंह; भारतात घातपाती कारवाया करणे थांबवा

लेह : काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून, त्याविषयी बोलायचा पाकिस्तानला काडीचाही अधिकार नाही असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ठणकावले आहे. येथे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (डीआरडीओ) या संस्थेतर्फे गुरुवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.काश्मीर पाकिस्तानचे होते कधी की ते या प्रदेशाबद्दल इतके अश्रू ढाळत आहेत असाही सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर एक देश म्हणून त्याचा भारताने नेहमीच आदर केला आहे. पाकिस्तानशी आम्हाला उत्तम संबंध हवे आहेत. मात्र त्याआधी भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचे पाकिस्तानने थांबविले पाहिजे.

मोदी सरकारने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्या निर्णयानंतर राजनाथसिंह लेहमध्ये पहिल्यांदाच आले होते. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचे गेल्या काही दिवसांत अनेक प्रयत्न केले. पण त्याची इतर देशांनी गंभीर दखल घेतली नाही. लडाखमधील सुरक्षा व्यवस्थेचा राजनाथसिंह यांनी या दौऱ्यामध्ये आढावा घेतला. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी हक्कांची जी गळचेपी सुरू आहे, त्याबद्दल पाकिस्ताननेबोलले पाहिजे. काश्मीर प्रश्नाबाबत कोणताही देश पाकिस्तानसोबत नाही. ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे आपण अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क इस्पेर यांना दूरध्वनीवरील संभाषणात सांगितल्याचेही राजनाथसिंहम्हणाले. (वृत्तसंस्था)राजनाथसिंह लडाखमध्येसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी लडाख येथील ‘किसान विज्ञान मेळ्या’ला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘डीआरडीओ’च्या फार्ममध्येही पाहणी केली.बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानाकाश्मीरवर काहीही हक्क नसताना पाकिस्तान सध्या बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा रीतीने वागत आहे.लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन तेथील स्थानिक नागरिकांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे.३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीर, लडाखच्या विकासातील मोठा अडथळा दूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Article 370कलम 370ladakhलडाख