शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

काश्मीरवर बोलायचा पाकला अधिकारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 04:57 IST

राजनाथसिंह; भारतात घातपाती कारवाया करणे थांबवा

लेह : काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून, त्याविषयी बोलायचा पाकिस्तानला काडीचाही अधिकार नाही असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ठणकावले आहे. येथे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (डीआरडीओ) या संस्थेतर्फे गुरुवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.काश्मीर पाकिस्तानचे होते कधी की ते या प्रदेशाबद्दल इतके अश्रू ढाळत आहेत असाही सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर एक देश म्हणून त्याचा भारताने नेहमीच आदर केला आहे. पाकिस्तानशी आम्हाला उत्तम संबंध हवे आहेत. मात्र त्याआधी भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचे पाकिस्तानने थांबविले पाहिजे.

मोदी सरकारने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्या निर्णयानंतर राजनाथसिंह लेहमध्ये पहिल्यांदाच आले होते. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचे गेल्या काही दिवसांत अनेक प्रयत्न केले. पण त्याची इतर देशांनी गंभीर दखल घेतली नाही. लडाखमधील सुरक्षा व्यवस्थेचा राजनाथसिंह यांनी या दौऱ्यामध्ये आढावा घेतला. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी हक्कांची जी गळचेपी सुरू आहे, त्याबद्दल पाकिस्ताननेबोलले पाहिजे. काश्मीर प्रश्नाबाबत कोणताही देश पाकिस्तानसोबत नाही. ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे आपण अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क इस्पेर यांना दूरध्वनीवरील संभाषणात सांगितल्याचेही राजनाथसिंहम्हणाले. (वृत्तसंस्था)राजनाथसिंह लडाखमध्येसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी लडाख येथील ‘किसान विज्ञान मेळ्या’ला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘डीआरडीओ’च्या फार्ममध्येही पाहणी केली.बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानाकाश्मीरवर काहीही हक्क नसताना पाकिस्तान सध्या बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा रीतीने वागत आहे.लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन तेथील स्थानिक नागरिकांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे.३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीर, लडाखच्या विकासातील मोठा अडथळा दूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Article 370कलम 370ladakhलडाख