शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

अभिनंदनला वीरचक्र पुरस्कार दिल्यानं पाकला झोंबली मिरची, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:22 IST

भारतीय हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यानंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबलेली दिसत आहे.

भारतीय हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यानंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबलेली दिसत आहे. कारण यावरुन पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे. २०१९ साली झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं एफ-१६ फायटर जेट पाडलं होतं. यादरम्यान अभिनंदन वर्धमान यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कोसळलं होतं आणि अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं होतं. भारतानं केवळ आपल्या देशातील जनतेला खूश करण्यासाठी अभिनंदन वर्धमान यांना पुरस्कार दिला आहे. खरंतर त्यांनी पाकिस्तानचं कोणतंही विमान पाडलेलं नाही, असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे. 

पाकिस्तानच्या हद्दीत पडण्याआधी भारतीय पायलट अभिनंद वर्धमान यांनी पाकचं एफ-१६ फायटर विमान पाडल्याचा दावा पाकिस्ताननं पूर्णपणे फेटाळून लावला आहे. अशी कोणतीही घटना घडली नव्हती आणि अशा पद्धतीनं न घडलेल्या घटेनेसाठी एका पायलटा पुरस्कार देऊन सन्मान करण्यामागचा भारताचा हेतू स्पष्ट दिसून येतो की त्यांना आपल्या देशातील जनतेला फक्त खूश करायचं आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. 

पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतानं केलेले दावे कसे खोटे आहेत याचीच री ओढली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि अमेरिकेचे अधिकारी स्वत: येऊन पुष्टी करुन गेले आहेत. त्यांनी देखील कोणतंही पाकिस्तानी एफ-१६ विमान नष्ट झालेलं नसल्याचं जाहीर केलं आहे. भारतानं केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. जागतिक पातळीवर सत्य समोर आल्यानंतरही भारतानं न घडलेल्या घटनेसाठी आपल्या पायलटला पुरस्कार देणं ही खरंतर हास्यास्पद गोष्ट आहे, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. भारत सरकारकडून वीरतेसाठी दिला जाणारा पुरस्कार एका काल्पनिक घटनेसाठी दिला जातोय हे खरंतर पुरस्कारासाठीच्या मापदंडात बसत नाही. असं करुन भारतानं स्वत:चं हसं करुन घेतलं आहे, असंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.  

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दल