शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकचा गोळीबार; ५ रहिवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:04 IST

नागरिक म्हणतात, मोदींनी आता युद्धच छेडावे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळीबार कधीच झाला नव्हता

जम्मू : पाकिस्तानने जम्मूजवळील नियंत्रण रेषेवर मंगळवार रात्रीपासून सुरू केलेल्या गोळीबार, तोफमाऱ्यांत पाच रहिवाशांचा मृत्यू झाला. तेथील किमान १00 गावे ताबडतोब रिकामी करण्यात आली आहे. त्या भागांतील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, रहिवाशांना अन्यत्र हलविण्याचे काम सुरू केले आहे.पाक सैनिकांनी बुधवारी कथुआ जिल्ह्यातील हिरानगर सीमेवर गोळीबार सुरू केला. त्यात रामपाल नावाचा रहिवासी मरण पावला. मृतांमध्ये हिरानगर सेक्टरमधील लोदी गावातीन तीन जण असून, एक रहिवासी अरनिया सेक्टरमधील रहिवासी आहे. काल रात्रीपासूनच्या पाक हल्ल्यातील मृतांची संख्या पाच झाली असून, काल सकाळीही एक आठ महिन्यांचे मूल मरण पावले होते. सोमवारी एक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पाक दुतावासातील अधिकाºयाला परराष्टÑ खात्याने बोलावून गंभीर समज दिली. ‘गेल्या ९ दिवसांत पाकच्या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या १0 झाली आहे. २ जवानही शहीद झाले. (वृत्तसंस्था)बीएसएफच्या ४0 चौक्यांवर गोळीबार, तोफांचा मारापाकिस्तानने बीएसएफच्या जवळपास ४0 चौक्यांना लक्ष्य केले असून, गोळीबाराबरोबरच सीमेपलिकडून तोफांचा माराही सुरू आहे.गोळीबार व तोफमारा यांमुळे सीमेवरील गावांतील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर काही घरी आता राहण्यायोग्य राहिलेलीच नाहीत.या प्रकारामुळे नियंत्रण रेषेवरील गावांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. सुमारे १00 गावांतील लोकांना पोलीस व सशस्त्र दलांच्या मदतीने सुरक्षित छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यापाकिस्तानच्या हल्ल्यांना त्याहून अधिक आक्रमकपणे उत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारीच बीएसफएफच्या जवानांना दिल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. तीन दिवसांपूर्वी बीएसएफने पाकच्या अनेक चौक्या पार उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी आता हल्ले थांबवा, अशी गयावया बीएसएफला केली होती. पण स्वत: मात्र गोळीबार थांबवला नाही.खोºयात अतिरेकी हल्लाश्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरामध्ये आज सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यात सहा स्थानिक रहिवासी जखमी झाले असून, त्यात एक महिला आहे. अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकला. मात्र तो दुसरीकडे पडून त्याचा स्फोट झाला. तेथून जाणारे सहा रहिवासी त्यामुळे जखमी झाले. ग्रेनेड फेकून दहशतवादी पळून गेले. चवान त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून मंगळवारी रात्रीपासून हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया व आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू आहे. सरकारी व खासगी अशा सर्व शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. यावर्षी अनेकदा शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान