शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने केला तोफगोळ्यांचा मारा, भारतीय लष्कराचेही चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 06:23 IST

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माऱ्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते.

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गुरुवारी सकाळी पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफगोळ्यांचा मारा व गोळीबार केला. त्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.यासंदर्भात लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या बालाकोट व मेंधार भागामध्ये तोफगोळ्यांचा मारा व गोळीबार केला. या महिन्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत मारा केल्याचे २४ प्रकार घडले आहेत.जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माऱ्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एका लष्करी अधिकाºयाचा समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याआधी २ सप्टेंबर रोजी राजौरी विभागातील केरी येथे पाकिस्तानी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माºयात भारतीय लष्कराचा अधिकारी शहीद झाला होता.कोंडीत पकडण्याची रणनीतीचीनबरोबर तणावग्रस्त बनलेल्या भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाकिस्ताननेही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफगोळ्यांचा मारा, तसेच गोळीबार करण्याचे प्रमाण वाढविले.पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.चीन व पाकिस्तान यांचे घनिष्ठ संबंध असून, त्या दोघांनी मिळून भारताला कोंडीत पकडण्याची चाल खेळली असल्याची चर्चा आहे.पूर्व लडाखमधील गलवान खोºयात चीनच्या लष्कराचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते.यावेळी भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत चीनच्या ६० सैनिकांना ठार केले होते, असे वृत्त अमेरिकेच्या एका साप्ताहिकाने नुकतेच प्रसिद्ध केले होते. चीनबरोबर पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर