शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 08:19 IST

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूने नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला आहे.

Operation Sindoor: भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मंगळवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक मोठे दहशतवादी मारले गेल्याचे म्हटलं जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बाजूने नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात ३ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १२ दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य सीमेवर चिथावणीखोर कारवाया करत आहे. भारतानेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरू ठेवत सामान्य भारतीयांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानने एलओसीवर गोळीबार केला. या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानी मोर्टार शेलिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचेही नुकसान झाले आहे.

पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. भारतीय सैन्याने जारी केलेल्या निवेदनात,अंधाधुंद गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य योग्य प्रत्युत्तर देत आहे, असं म्हटलं. ६ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गोळीबार केला, ज्यामध्ये तोफखान्याचाही मारा करण्यात आला. याआधीही, पहलगाम हल्ल्यापासून पाकिस्तान सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे, ज्यावर भारत योग्य उत्तर देत आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान