शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 08:19 IST

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूने नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला आहे.

Operation Sindoor: भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मंगळवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक मोठे दहशतवादी मारले गेल्याचे म्हटलं जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बाजूने नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात ३ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १२ दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य सीमेवर चिथावणीखोर कारवाया करत आहे. भारतानेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरू ठेवत सामान्य भारतीयांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानने एलओसीवर गोळीबार केला. या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानी मोर्टार शेलिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचेही नुकसान झाले आहे.

पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. भारतीय सैन्याने जारी केलेल्या निवेदनात,अंधाधुंद गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य योग्य प्रत्युत्तर देत आहे, असं म्हटलं. ६ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गोळीबार केला, ज्यामध्ये तोफखान्याचाही मारा करण्यात आला. याआधीही, पहलगाम हल्ल्यापासून पाकिस्तान सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे, ज्यावर भारत योग्य उत्तर देत आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान