शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:36 IST

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले ...

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहे. दोन्ही देशांनी युद्धविराम केला असला, तरी पाकची सीमेवरील धुसफूस अजूनही सुरूच आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत, आपली चिंता व्यक्त केली. यावर भारताने त्यांना चोख उत्तर देत, तिथेच गपगार केलं. "जो देश दहशतवादी आणि आपल्या नागरिकांमध्ये फरक ओळखू शकत नाही, त्याला नागरिकांच्या सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही", असे भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पुरी यांनी म्हटले. 

पाकिस्तानच्या ढोंगी आणि निराधार विधानांना हरीश पुरी यांनी तथ्य सादर करत उत्तर दिले. पाकिस्तान दहशतवादाला कसा आश्रय देतो, याची उदाहरणे देखील त्यांनी यावेळी दिली. हरीश पुरी म्हणाले की, "मुंबईतील २६/११चा हल्ला असो, किंवा एप्रिल २०२५ मध्ये झालेला पहलगाम हल्ला, पाकपुरस्कृत दहशतवाद भारताला गेल्या अनेक दशकांपासून सहन करावा लागत आहे. त्यांनी नेहमीच सामान्य नागरिकांना आपले लक्ष्य बनवले.अशा देशाने नागरिकांच्या सुरक्षेवर बोलणे म्हणजे तोंडात मारून घेण्यासारखे आहे."

पाकिस्तानी सैन्यावरही गंभीर आरोप पाकिस्तानची पोलखोल करताना हरीश पुरी म्हणाले की, पाकिस्तानच्या सैन्याने सीमेलगतच्या भागातील गावांमध्ये जाणूनबुजून गोळीबार केला. या गोळीबारांच्या घटनेमध्ये २०हून अधिक निष्पाप नागरिक मारले गेले, तर ८०हून अधिक लोक जखमी झाले. अशा भ्याड हल्ल्यांमध्ये गुरुद्वारा, मंदिरे, चर्च आणि रुग्णालये यांना निशाणा बनवले गेले. सामान्य नागरिकांनाच लक्ष्य करणाऱ्या सैन्याच्या देशाने हे व्यासपीठ म्हणजेच उपदेश देण्याचे ठिकाण समजू नये."

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्य यात्रेत पाकिस्तानचे सरकारी अधिकारी, पोलीस आणि लष्करी अधिकारी देखील सामील होते, याकडेही भारतानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. हरीश पुरी म्हणाले की, "यावरूनच सिद्ध होतं की, पाकिस्तान दहशतवादी आणि सामान्य नागरिक यांच्यात काहीच फरक करत नाही. उलट पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांची ढाल बनवतो. पाकिस्तान दहशतवादाचा वापर राज्य धोरण म्हणून करत राहील, तोपर्यंत त्यांना कोणत्याही नैतिक चर्चेत भाग घेण्याचा अधिकार नाही."

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला