शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
2
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
3
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
4
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
5
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
6
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
7
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
8
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
9
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
10
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
11
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
12
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
13
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
14
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
15
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
16
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
17
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
18
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
19
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
20
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?

संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:36 IST

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले ...

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहे. दोन्ही देशांनी युद्धविराम केला असला, तरी पाकची सीमेवरील धुसफूस अजूनही सुरूच आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत, आपली चिंता व्यक्त केली. यावर भारताने त्यांना चोख उत्तर देत, तिथेच गपगार केलं. "जो देश दहशतवादी आणि आपल्या नागरिकांमध्ये फरक ओळखू शकत नाही, त्याला नागरिकांच्या सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही", असे भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पुरी यांनी म्हटले. 

पाकिस्तानच्या ढोंगी आणि निराधार विधानांना हरीश पुरी यांनी तथ्य सादर करत उत्तर दिले. पाकिस्तान दहशतवादाला कसा आश्रय देतो, याची उदाहरणे देखील त्यांनी यावेळी दिली. हरीश पुरी म्हणाले की, "मुंबईतील २६/११चा हल्ला असो, किंवा एप्रिल २०२५ मध्ये झालेला पहलगाम हल्ला, पाकपुरस्कृत दहशतवाद भारताला गेल्या अनेक दशकांपासून सहन करावा लागत आहे. त्यांनी नेहमीच सामान्य नागरिकांना आपले लक्ष्य बनवले.अशा देशाने नागरिकांच्या सुरक्षेवर बोलणे म्हणजे तोंडात मारून घेण्यासारखे आहे."

पाकिस्तानी सैन्यावरही गंभीर आरोप पाकिस्तानची पोलखोल करताना हरीश पुरी म्हणाले की, पाकिस्तानच्या सैन्याने सीमेलगतच्या भागातील गावांमध्ये जाणूनबुजून गोळीबार केला. या गोळीबारांच्या घटनेमध्ये २०हून अधिक निष्पाप नागरिक मारले गेले, तर ८०हून अधिक लोक जखमी झाले. अशा भ्याड हल्ल्यांमध्ये गुरुद्वारा, मंदिरे, चर्च आणि रुग्णालये यांना निशाणा बनवले गेले. सामान्य नागरिकांनाच लक्ष्य करणाऱ्या सैन्याच्या देशाने हे व्यासपीठ म्हणजेच उपदेश देण्याचे ठिकाण समजू नये."

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्य यात्रेत पाकिस्तानचे सरकारी अधिकारी, पोलीस आणि लष्करी अधिकारी देखील सामील होते, याकडेही भारतानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. हरीश पुरी म्हणाले की, "यावरूनच सिद्ध होतं की, पाकिस्तान दहशतवादी आणि सामान्य नागरिक यांच्यात काहीच फरक करत नाही. उलट पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांची ढाल बनवतो. पाकिस्तान दहशतवादाचा वापर राज्य धोरण म्हणून करत राहील, तोपर्यंत त्यांना कोणत्याही नैतिक चर्चेत भाग घेण्याचा अधिकार नाही."

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला