शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाकिस्तानची हातमिळवणी धोकादायक; आव्हानांना तोंड देण्यास भारत सज्ज- लष्करप्रमुख

By कुणाल गवाणकर | Updated: January 12, 2021 13:02 IST

सीमेपलीकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम; लष्करप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली: पाकिस्तान आणि चीन यांचं एकत्र येणं भारतासाठी धोकादायक आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम सुरू आहे. त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर दिलं जाईल. त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करू, असा स्पष्ट इशारा लष्करप्रमुख मनोज नरवणेंनी दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी देशापुढील धोक्यांची माहिती दिली.पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिलं जातं. मात्र आम्ही दहशतवाद कदापि सहन करणार नाही. ही आमची भूमिका आहे. दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करतो, हा संदेश आपल्याकडून सीमेपलीकडील देशाला देण्यात आलेला आहे, असं नरवणे म्हणाले. यावेळी त्यांनी चीन आणि पाकिस्तानच्या जवळिकीवरही भाष्य केलं. 'लष्करी आणि बिगरलष्करी क्षेत्रांमध्ये चीन आणि पाकिस्तानचं सहकार्य वाढत आहे. त्यामुळे दोन आघाड्यांवर आव्हांनाचा सामना करण्याची तयारी आपल्याला ठेवायला हवी,' असं नरवणे म्हणाले.चिनी सैन्यासोबत लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप संपलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. 'आम्ही याआधीही आव्हानांचा सामना करून मार्गक्रमण केलं आहे. भारतीय लष्करानं लडाखमध्येच नव्हे, तर संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्ती वाढवल्या आहेत. भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील आठ बैठका झाल्या आहेत. आता लवकरच नववी बैठक होईल,' असं नवरणेंनी सांगितलं.कोरोना महामारी आणि उत्तर सीमांवरील परिस्थिती आमच्यापुढील दोन प्रमुख मोठी आव्हानं होती. सीमेवरील परिस्थिती पाहता आम्ही सीमेवरील सतर्कता वाढवली आहे. सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे. पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे तयार आहोत, अशा शब्दांत नरवणेंनी चीनला इशारा दिला. भविष्यातील आव्हानांचा विचार लष्कराला अधिकाधिक सुसज्ज करण्यात येईल. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल, असं नरवणे म्हणाले.

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तान