शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

पाक टेरर बोट - तटरक्षक दलचा अधिकारी व केंद्र सरकार आमने सामने

By admin | Updated: February 18, 2015 13:02 IST

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकमधून आढळलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकिस्तानमधून आलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे. विशेष म्हणजे, इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिल्यानंतर डीआयजी लोशाली यांनी या वृत्ताचा इन्कार केला आणि आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचा दावा केला. त्यावर कडी करताना इंडियन एक्स्प्रेसने लोशाली यांच्या भाषणाची चित्रफीत अपलोड केली आहे. यामध्ये सदर बोट उडवण्याचे आदेश आपणच गांधीनगर येथून तटरक्षक दलाच्या जवानांना दिल्याचे ते सांगताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे तटरक्षक दल आणि संरशक्षण खाते आमनेसामने असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकार व तटरक्षक दलाच्या अधिका-याने परस्परविरोधी विधान केल्याने बोटीभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. 
गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असतानाच गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली संशयास्पद बोट आढळली होती. तटरक्षक दलाच्या जवानांनी बोटीचा पाठलाग केला असता बोटीवरील चार ते पाच संशयित दहशतवाद्यांनी बाँबस्फोट घडवून बोटीला उडवल्याचा दावा केंद्र सरकारने केला. तर भारतात पुन्हा २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा प्रयत्न उधळला असा दावा तटरक्षक दलानेही केला होता. मात्र या कारवाईविषयी सुरुवातीपासूनच शंका उपस्थित होत होत्या. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील स्मगलर आत्महत्या करत नाहीत असे सांगत बोटीत दहशतवादी होते असा दावा करत बोटीवरील संशयितांनीच बोट उडवली असे स्पष्ट केले होते. 
मात्र आता तटरक्षक दलाच्याच वरिष्ठ अधिका-याने या दाव्याशी विसंगत विधान केल्याचे समोर येत आहे. 'तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेल, त्या दिवशी पाकमधून एक बोट आली होती, त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, आम्हाला त्या लोकांना बिर्यानी द्यायची नव्हती' असे विधान तटरक्षक दलाचे डीआयजी बी. के. लोशाली यांनी केले. लोशाली  गुजरातमधील तटरक्षक दलाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. लोशाली यांचा हा दावा आता मोदी सरकारची डोेकेदुखी वाढवेल असे दिसते.