शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाक टेरर बोट - तटरक्षक दलचा अधिकारी व केंद्र सरकार आमने सामने

By admin | Updated: February 18, 2015 13:02 IST

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकमधून आढळलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकिस्तानमधून आलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे. विशेष म्हणजे, इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिल्यानंतर डीआयजी लोशाली यांनी या वृत्ताचा इन्कार केला आणि आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचा दावा केला. त्यावर कडी करताना इंडियन एक्स्प्रेसने लोशाली यांच्या भाषणाची चित्रफीत अपलोड केली आहे. यामध्ये सदर बोट उडवण्याचे आदेश आपणच गांधीनगर येथून तटरक्षक दलाच्या जवानांना दिल्याचे ते सांगताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे तटरक्षक दल आणि संरशक्षण खाते आमनेसामने असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकार व तटरक्षक दलाच्या अधिका-याने परस्परविरोधी विधान केल्याने बोटीभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. 
गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असतानाच गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली संशयास्पद बोट आढळली होती. तटरक्षक दलाच्या जवानांनी बोटीचा पाठलाग केला असता बोटीवरील चार ते पाच संशयित दहशतवाद्यांनी बाँबस्फोट घडवून बोटीला उडवल्याचा दावा केंद्र सरकारने केला. तर भारतात पुन्हा २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा प्रयत्न उधळला असा दावा तटरक्षक दलानेही केला होता. मात्र या कारवाईविषयी सुरुवातीपासूनच शंका उपस्थित होत होत्या. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील स्मगलर आत्महत्या करत नाहीत असे सांगत बोटीत दहशतवादी होते असा दावा करत बोटीवरील संशयितांनीच बोट उडवली असे स्पष्ट केले होते. 
मात्र आता तटरक्षक दलाच्याच वरिष्ठ अधिका-याने या दाव्याशी विसंगत विधान केल्याचे समोर येत आहे. 'तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेल, त्या दिवशी पाकमधून एक बोट आली होती, त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, आम्हाला त्या लोकांना बिर्यानी द्यायची नव्हती' असे विधान तटरक्षक दलाचे डीआयजी बी. के. लोशाली यांनी केले. लोशाली  गुजरातमधील तटरक्षक दलाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. लोशाली यांचा हा दावा आता मोदी सरकारची डोेकेदुखी वाढवेल असे दिसते.