शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

पाक टेरर बोट - तटरक्षक दलचा अधिकारी व केंद्र सरकार आमने सामने

By admin | Updated: February 18, 2015 13:02 IST

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकमधून आढळलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकिस्तानमधून आलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे. विशेष म्हणजे, इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिल्यानंतर डीआयजी लोशाली यांनी या वृत्ताचा इन्कार केला आणि आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचा दावा केला. त्यावर कडी करताना इंडियन एक्स्प्रेसने लोशाली यांच्या भाषणाची चित्रफीत अपलोड केली आहे. यामध्ये सदर बोट उडवण्याचे आदेश आपणच गांधीनगर येथून तटरक्षक दलाच्या जवानांना दिल्याचे ते सांगताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे तटरक्षक दल आणि संरशक्षण खाते आमनेसामने असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकार व तटरक्षक दलाच्या अधिका-याने परस्परविरोधी विधान केल्याने बोटीभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. 
गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असतानाच गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली संशयास्पद बोट आढळली होती. तटरक्षक दलाच्या जवानांनी बोटीचा पाठलाग केला असता बोटीवरील चार ते पाच संशयित दहशतवाद्यांनी बाँबस्फोट घडवून बोटीला उडवल्याचा दावा केंद्र सरकारने केला. तर भारतात पुन्हा २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा प्रयत्न उधळला असा दावा तटरक्षक दलानेही केला होता. मात्र या कारवाईविषयी सुरुवातीपासूनच शंका उपस्थित होत होत्या. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील स्मगलर आत्महत्या करत नाहीत असे सांगत बोटीत दहशतवादी होते असा दावा करत बोटीवरील संशयितांनीच बोट उडवली असे स्पष्ट केले होते. 
मात्र आता तटरक्षक दलाच्याच वरिष्ठ अधिका-याने या दाव्याशी विसंगत विधान केल्याचे समोर येत आहे. 'तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेल, त्या दिवशी पाकमधून एक बोट आली होती, त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, आम्हाला त्या लोकांना बिर्यानी द्यायची नव्हती' असे विधान तटरक्षक दलाचे डीआयजी बी. के. लोशाली यांनी केले. लोशाली  गुजरातमधील तटरक्षक दलाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. लोशाली यांचा हा दावा आता मोदी सरकारची डोेकेदुखी वाढवेल असे दिसते.