शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पाकला ठणकावले : पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका - रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 01:48 IST

‘ऑपरेशन विजय’ची २० वर्षे; आज देशभर साजरा होणार वर्धापन दिन

नवी दिल्ली : काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला शुक्रवारी २0 वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या आदल्याच दिवशी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला ठणकावले. पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका, असा सज्जड दम रावत यांनी पाकिस्तानला भरला.

ते द्रास येथे बोलत होते. पाकिस्तानने असे दुश्कृत्य करण्याची खुमखुमी भविष्यात परत कधीच आणि कुठेही दाखवू नये. एवढेच नाही तर, पुन्हा असे करू शकू याचा विचारही पाकिस्तानने करू नये, असा दम जनरल रावत यांनी भरला.

या युद्धाला शुक्रवारी २0 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभर ‘ऑपरेशन विजय’चा वर्धापन दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होणार आहे. भारताच्या हद्दीतून पाकच्या प्रत्येक जवानाला हाकलून देण्यात भारतीय जवानांना २६ जुलै रोजी यश आले. त्यामुळेच विजय दिनाचे महत्त्व आहे. कारगिल दिनाच्या निमित्ताने तिथे लढलेल्या प्रत्येक जिवंत व हुतात्मा जवानाचे स्मरण उद्या केले जाणार आहे. यानिमित्ताने उरी हल्ल्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट महाराष्ट्रात ९0 हजार विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे. या दिनानिमित्त आज काश्मीरमध्ये जवानांनी प्रात्यक्षिकेही केली.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिन