शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

'भारतीय लष्कराची चौकी उडविली, पाच जवान मारले'; पाकिस्तानी सैन्याचा व्हिडीओच्या माध्यमातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 15:14 IST

व्हिडीओ जारी करून पाकिस्तानी सैन्याने हा दावा केला आहे.

श्रीनगर- नियंत्रण रेषेवर भारताकडून नागरीकांना निशाणा बनविला गेल्यानंतर भारताची चौकी उडविली आहे. यामध्ये पाच भारतीय जवान मारले गेले असल्याचा दावा गुरूवारी पाकिस्तानी सैन्याने केला आहे. व्हिडीओ जारी करून पाकिस्तानी सैन्याने हा दावा केला आहे. पाकिस्ताने सेनेच्या इंटर सर्व्हिस रिलेशनचे महानिर्देशक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय चौकीवर हल्ला केल्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. नियंत्रण रेषेवर टाट्टा पाणी (हॉट स्प्रिंग) सेक्टरमध्ये सामान्य नागरीकांना निशाणा बनविणारी भारतीये सेनेची चौकी पाकिस्तानी सैनिकांनी उडविली आहे. यामध्ये पाच भारतीय सैनिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाले आहेत, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. 

गफूर यांच्याद्वारे ट्विट केल्या गेलेल्या 57 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये जंगलातून धूर निघताना दिसतो आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, स्थानिक पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं आहे की,पीओकेमध्ये सीमेला लागून असणाऱ्या अतिसंवेदनशील गावात भारतीय जवानांकडून एक स्कूल व्हॅनवर हल्ला करत बसच्या ड्रायव्हरला मारण्यात आलं. या घटनेच्या काही तासाने भारतीय चौकी उडविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हल्ला झालेल्या स्कूल बसमध्ये चार विद्यार्थी होते. गाडी मुलांना घेऊन मंढोलमधून धरमसाल येथे जात होती. त्यावेळी जवळपास दिड वाजता भारतीय सैनिकांनी गाडीवर हल्ला केला. हत्या झालेल्या गाडीच्या ड्रायव्हरची ओळख मोहम्मद सरफराज अशी पटली आहे, असं हजीरा सिंकदरचे असिस्टंट कमिश्नर हयात यांनी म्हंटलं.