शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:25 IST

जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आज सकाळपासून या भागात जोरदार चकमक सुरू आहे. त्यात २ सुरक्षा जवान जखमी झालेत. 

श्रीनगर - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच केंद्र सरकारसोबतच भारतीय लष्कर एक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी बंदीपोरा इथं सैन्याला मोठं यश मिळाले. लष्करी जवानांनी लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लल्लीला चकमकीत ठार केला आहे. विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लश्कर ए तोयबाच्या रेजिस्टेंस फोर्सनं घेतली होती. 

२२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात काही महाराष्ट्रातील पर्यटकही होते. दहशतवाद्यांच्या या कृत्यानंतर काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून सर्च मोहीम वेगाने सुरू आहे. बंदीपोरा भागात काही दहशतवादी असल्याची माहिती सैन्याला मिळाली. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आज सकाळपासून या भागात जोरदार चकमक सुरू आहे. त्यात २ सुरक्षा जवान जखमी झालेत. 

आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त 

दहशतवादी नेटवर्कविरोधात सैन्याने कठोर पाऊल उचलले आहे. त्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आसिफ शेखचं घर बॉम्बने उडवण्यात आले आहे. आसिफ लश्कर ए तोयबाचा दहशतवादी होता. सुरक्षा जवानांनी त्रालमध्ये ही कारवाई केली. 

हँड ग्रेनेड आणि शस्त्रसाठा जप्त

बंदीपोरा भागात नाका तपासणीदरम्यान पोलिसांनी मोहम्मद रफिक खांडे आणि मुख्तार अहमद डार यांना पकडले. त्यांच्याकडून बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. जेव्हा पोलिसांनी भारतीय सैन्यासह नाकेबंदी केली तेव्हा त्यांनी रईस अहमद डार आणि मोहम्मद शफी डार यांना अटक केली. त्यांच्याकडून हँड ग्रेनेड ०१, ७.६२ मिमी मॅगझिन ०१ आणि ७.६२ मिमीचे ३० राउंड जप्त करण्यात आले.

उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ

देशात दहशतवाद्यांचे उरलेसुरले अस्तित्व पूर्णपणे उद्धवस्त  करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दहशतवादी व त्याच्या पाठीराख्यांना आम्ही शोधून काढू व त्यांच्यावर कठोर कारवाई करू. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते दडून बसले असतील तरी त्यांना हुडकून काढू असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर