शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 08:16 IST

Pahalgam Terror Attack: गुरुवारी रात्रीपासून काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर संघर्षाचा भडका उडाला असून, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या दिशेने रात्रभर गोळीबार केला. त्यानंतर भारतीय लष्कराकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. तसेच पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांची हत्या केल्यानंतर पाकिस्तानला कुटनीतिक  मार्गांबरोबरच लष्करी कारवाईमधून अद्दल घडवण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी रात्रीपासून काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर संघर्षाचा भडका उडाला असून, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या दिशेने रात्रभर गोळीबार केला. त्यानंतर भारतीय लष्कराकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्यांमधून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात भारतीय लष्कर आणि नागरिकांची कुठलीही हानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, भारतीय लष्करामधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर लहान हत्यारांच्या मदतीने हल्ला केला आहे. तसेच आमचं लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती समोर येणं बाकी आहे.

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण असतानाच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी विविध पर्यायांवर सध्या विचार सुरू आहे. पहलगाममध्ये घडलेल्या नरसंहारानंतर भारतपाकिस्तानविरोधात युद्ध पुकारणार का, असा प्रश्न असंख्य लोकांना पडला आहे. मात्र, सीमेवर संपूर्ण युद्ध न होता कारगिलसारखी लघु युद्धे दोन्ही देशांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्करालाही अतिशय सतर्क राहण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला असून, ही काही गोष्टींची पूर्वतयारी असू शकते असेही म्हटले जात आहे.

दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी हे चार पर्याय काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे नष्ट करण्यासाठी चार प्रमुख पर्याय भारतीय लष्कराने केंद्र सरकारला सुचविले. त्यातील एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे ब्रह्मोस, पृथ्वी क्षेपणास्त्रांसारख्या जमिनीवरून जमिनीवर मारा करता येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करावा. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे या क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करता येतील. उर्वरित तीन पर्यायही विचाराधीन असून, त्यापैकी एक म्हणजे भारतीय लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. म्हणजे लष्कर सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई करून, एलओसी पार करून दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करून माघारी येईल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर