शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 10:17 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.

Pahalgam Terror Attack ( Marathi News ) : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवार २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान सतर्क झाले आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराचे जवान मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत आहेत.पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या ५ दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, यामध्ये ३ पाकिस्तानी आणि २ काश्मिरी नागरिकांचा समावेश आहे.

सुरक्षा दलांनी बांदीपोरा येथे लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. सध्या जम्मू आणि काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय सैन्याकडून शोध मोहीम राबविली जात आहे.

आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई

पोलिस आणि लष्कराने शोधमोहिम राबवली

आज गुरुवारी भारतीय लष्कराने पूंछच्या लसाना वनक्षेत्रात जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुप सोबत संयुक्त शोध मोहीम सुरू केली. पोलिस आणि एसओजीचे जवान जंगल आणि पर्वतांमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या ५ दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या चार ओव्हरग्राउंड कामगारांना पकडले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले

 

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. यानंतर, भारत सरकारने बुधवारी पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावून घेतले आणि त्यांना औपचारिक 'पर्सोना नॉन ग्राटा' नोट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (CCS) आपत्कालीन बैठक झाली. ही बैठक दोन तास चालली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. या बैठकीत दहशतवादी हल्ल्याला गांभीर्याने घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान