शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:36 IST

Pahalgam Attack: एकट्या दिल्लीतच पाच हजारहून अधिक पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. पाकिस्तानींनी सीमेजवळील राज्येच नाहीत तर अगदी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात देखील वास्तव्य केलेले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. याची मुदत आज संपत आहे. सर्वांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यामुळे ज्यांना सीमा बंद होण्याची भीती आहे, ते त्यांच्या देशात जात आहेत. परंतू, असे हजारो लोक आहेत जे तसूभरही हललेले नाहीत. अशा लोकांना शोधून शोधून पाकिस्तानात हाकलून देण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांना दिले आहेत.  

एकट्या दिल्लीतच पाच हजारहून अधिक पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. पाकिस्तानींनी सीमेजवळील राज्येच नाहीत तर अगदी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात देखील वास्तव्य केलेले आहे. आता सर्वच राज्यांत शोधमोहिम सुरु केली जाणार आहे. काही नागरिकच या पाकिस्तानींची माहिती देत आहेत. अशांना पकडून वाघा बॉर्डरवर धाडले जाणार आहे. दिल्लीत ५००० लोकांची ओळख पटविण्यात आल्याचे आयबीने म्हटले आहे. भारताच्या या गुप्तचर यंत्रणेने या लोकांची यादीच दिल्ली पोलिसांकडे दिली आहे. 

पुण्यात बंडगार्डन सारख्या लष्करी तळ असलेल्या भागात सुमारे १११ पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने लाँग टर्म व्हिसावर असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश सर्वाधिक आहे. त्यासह व्हिजिटर व्हिसावर आलेले पाकिस्तानीदेखील काही प्रमाणात शहरात आहेत. महत्वाचे म्हणजे काही वर्षांपूर्वी वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी म्हणून आलेले ३०-३५ पाकिस्तानी परत पाकिस्तानात गेलेले नाहीत. हे पाकिस्तानी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेकुठे लपलेले आहेत. 

बेकायदा आलेल्यांचे काय...परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात, तेथील जवळच्या पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद करावी लागते. परंतू जे बेकायदा आले आहेत, त्यांची कोणाकडेच नोंद नसते. या लोकांना भारतातीलच लोक बनावट कागदपत्रे, नातेवाईक असल्याचे सांगून असे कागद बनवून घेतात. यामुळे हे लोक राजरोसपणे राहतात. अशा लोकांना शोधण्याचे मोठे कष्ट यंत्रणेला घ्यावे लागणार आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला