शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पान 3 : बार्देसमधील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

म्हापसा : पावसाने दडी मारल्याने बार्देसमधील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेती करपून जाण्याचा धोका आहे.

म्हापसा : पावसाने दडी मारल्याने बार्देसमधील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेती करपून जाण्याचा धोका आहे.
पेरणी केलेल्या भातातून कणसे यायला सुरुवात झाली नसून चतुर्थीपर्यंत येणारी कणसे यंदा अजूनपर्यंत आली नसल्याची माहिती हळदोणातील एका शेतकर्‍याने दिली. पेरणी केलेल्या पिकातील काही पिके सरासरीवर 80 ते 120 दिवसांत पिकतात; पण काही पिकांना 40 ते 60 दिवसच झाल्याची माहिती कृषी विभागीय कार्यालयातील उपसंचालक अनिल नोरोन्हा यांनी दिली.
कृषी खात्याच्या विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बार्देस तालुक्यात 5370 हेक्टर जागेत खरीप हंगामात लागवड करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यंदा विभागीय कार्यालयातून शेतकर्‍यांना सुमारे 110 टन विविध जातीचे भात बियाणे लागवडीसाठी देण्यात आले आहे. यात ज्योती, जया, करंगुट, कर्जत व इतर जातीच्या बियाण्यांचा समावेश आहे.
या 5370 हेक्टर शेतीतील फक्त 20 टक्के हेक्टर शेतीत र्शी पद्धतीचा वापर करून यंदा लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 60 हेक्टर शेतीत र्शी पद्धतीचा वापर करण्यात आला होता.
पाण्याअभावी भरड शेतीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली असून काही शेतात पंपाच्या साहाय्याने पाणी देण्यात येत आहे. अशा शेतांवर जास्त प्रमाणात परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले. भरड शेतीवर लगेचच परिणाम जाणवणार असल्याची माहिती दिली. (खास प्रतिनिधी)

चौकट
मूग पीक घ्या
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कृषी खात्याने शेतकर्‍यांसाठी मागील काही दिवसांत 50 किलो मुगाचे वितरण केले आहे. मुगाचे पीक सरासरी 50 दिवसांत येत असल्याने हे पीक शेतकर्‍यांना घेता येईल, असे नोरोन्हा म्हणाले. ज्या शेतकर्‍यांनी लागवड केली नाही, अशा शेतकर्‍यांनी मूग खात्याकडून नेण्यास सुरुवात केली आहे.