शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

पान १ - दुष्काळग्रस्त मुंबईत

By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST

दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत

दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत
पुलाखाली मांडला संसार : विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो कुटुंबियांचे स्थलांतर
प्राची सोनावणे
नवी मुंबई : पावसाने ओढ दिल्याने नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. प्यायला पाणी व हाताला काम नसल्यामुळे शेकडो दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यातील मुंबईकडे येऊ लागले आहेत. मिळेल ते काम करून अन् मिळेल तिथे मुक्काम करून आयुष्य कंठत आहेत.
सप्टेंबर सुरू झाला तरी, अद्याप राज्याच्या अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. विदर्भ, मराठवड्यात पिके उन्हामुळे करपत आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्षही पडू लागले आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली व इतर जिल्ह्यांतील जवळपास ४०० कुटंुबे नवी मुंबईत आली आहेत. यामधील जवळपास १०० जणांनी तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. अनेकजण नाकाकामगार म्हणून मिळेल ते काम करत आहेत. दिवसभर काम करून मिळालेल्या पैशांनी धान्य विकत घेऊन पुलाखालीच दगडाच्या चुलीवर जेवण बनविले जात आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळी संपली की विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त मुंंबईत येतात. पावसाळा सुरू झाला की गावाकडे जातात. यावर्षी पाऊसच पडला नसल्यामुळे गतवर्षी आलेल्यांनीही गावी जाणे टाळले आहे. पाऊसच नाही तर गावी जाऊन काय करणार, असे अनिल धनगरे या शेतकर्‍याने सांगितले. नाकाकामगार म्हणून तुर्भे येथे तो कामाच्या शोधात असतो.
अनेक शेतकर्‍यांनी वृद्ध आई-वडील, लहान मुलांना गावी ठेवले असून काम मिळविण्यासाठी येथे ते आले आहेत, असे शोभा बागडे म्हणाली. गावाकडील आपल्या माणसांसाठी जीव तुटत असल्याचे सांगताना तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. पावसाने दगा दिल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कसे जगायचे, असा प्रश्न पडला असून आतातरी पाऊस होऊ दे, असे साकडे देवाला घातले असल्याची प्रतिक्रिया कल्पना कांबळे हिने दिली.
----------
मुलांचे विवाह रखडले
दुष्काळामुळे गावाकडे मुलांची लग्न होणेही अवघड झाले आहे. गावी उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. दुष्काळामुळे मजुरीची कामेही मिळत नाहीत. मुलगी मोठी झाली आहे. तिच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करायची आहे. त्यामुळे मिळेल ते काम करून चार पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- लता गायकवाड, यवतमाळ
-------
कर्ज फेडायचे कसे ?
लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. दुष्काळामुळे दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडू लागली असल्यामुळे रोजगाराच्या शोधात मंुबईला आलो असून या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
उमाबाई गजभे, शेतकरी पुसद, यवतमाळ
------
उपाशीपोटी झोपावे लागते
गावाकडे रोजगाराचे साधन नसल्यामुळे मुंबईत आलो आहे. कामासाठी नाक्यावर उभे रहावे लागते. कधी काम मिळते, कधी मिळत नाही. कित्येक वेळा काम न मिळाल्यामुळे उपाशीपोटी झोपावे लागत आहे. कामाच्या शोधात भटकताना गावाकडील कुटुंबियांची आठवण होते. भविष्यात तरी असा दुष्काळ पडू नये व पुन्हा रोजगाराच्या शोधात भटकंती करण्याची वेळ येऊ नये.
किसन माळी, शेतकरी, जालना
---------
मुंबईतही फरफट
मुंबईत येऊनही या दुष्काळग्रस्तांची फरफट सुरूच आहे. रहायला घर नसल्यामुळे नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली काहींनी आसरा घेतला आहे. दगडाची चुल करून त्यावर स्वयंपाक केला जात आहे. डासांचा उपद्रव होत असल्यामुळे शेतकरी व त्यांच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकजण दिवसभर मजुरीचे काम करतात आणि रात्री झोपण्यासाठी रेल्वेस्टेशनमध्ये जात आहेत. म्हातार्‍या व्यक्ती रेल्वे स्टेशन व परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत.
------------
फोटो -
०४दुष्काळग्रस्त