शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

पान १ - दुष्काळग्रस्त मुंबईत

By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST

दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत

दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत
पुलाखाली मांडला संसार : विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो कुटुंबियांचे स्थलांतर
प्राची सोनावणे
नवी मुंबई : पावसाने ओढ दिल्याने नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. प्यायला पाणी व हाताला काम नसल्यामुळे शेकडो दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यातील मुंबईकडे येऊ लागले आहेत. मिळेल ते काम करून अन् मिळेल तिथे मुक्काम करून आयुष्य कंठत आहेत.
सप्टेंबर सुरू झाला तरी, अद्याप राज्याच्या अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. विदर्भ, मराठवड्यात पिके उन्हामुळे करपत आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्षही पडू लागले आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली व इतर जिल्ह्यांतील जवळपास ४०० कुटंुबे नवी मुंबईत आली आहेत. यामधील जवळपास १०० जणांनी तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. अनेकजण नाकाकामगार म्हणून मिळेल ते काम करत आहेत. दिवसभर काम करून मिळालेल्या पैशांनी धान्य विकत घेऊन पुलाखालीच दगडाच्या चुलीवर जेवण बनविले जात आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळी संपली की विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त मुंंबईत येतात. पावसाळा सुरू झाला की गावाकडे जातात. यावर्षी पाऊसच पडला नसल्यामुळे गतवर्षी आलेल्यांनीही गावी जाणे टाळले आहे. पाऊसच नाही तर गावी जाऊन काय करणार, असे अनिल धनगरे या शेतकर्‍याने सांगितले. नाकाकामगार म्हणून तुर्भे येथे तो कामाच्या शोधात असतो.
अनेक शेतकर्‍यांनी वृद्ध आई-वडील, लहान मुलांना गावी ठेवले असून काम मिळविण्यासाठी येथे ते आले आहेत, असे शोभा बागडे म्हणाली. गावाकडील आपल्या माणसांसाठी जीव तुटत असल्याचे सांगताना तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. पावसाने दगा दिल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कसे जगायचे, असा प्रश्न पडला असून आतातरी पाऊस होऊ दे, असे साकडे देवाला घातले असल्याची प्रतिक्रिया कल्पना कांबळे हिने दिली.
----------
मुलांचे विवाह रखडले
दुष्काळामुळे गावाकडे मुलांची लग्न होणेही अवघड झाले आहे. गावी उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. दुष्काळामुळे मजुरीची कामेही मिळत नाहीत. मुलगी मोठी झाली आहे. तिच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करायची आहे. त्यामुळे मिळेल ते काम करून चार पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- लता गायकवाड, यवतमाळ
-------
कर्ज फेडायचे कसे ?
लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. दुष्काळामुळे दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडू लागली असल्यामुळे रोजगाराच्या शोधात मंुबईला आलो असून या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
उमाबाई गजभे, शेतकरी पुसद, यवतमाळ
------
उपाशीपोटी झोपावे लागते
गावाकडे रोजगाराचे साधन नसल्यामुळे मुंबईत आलो आहे. कामासाठी नाक्यावर उभे रहावे लागते. कधी काम मिळते, कधी मिळत नाही. कित्येक वेळा काम न मिळाल्यामुळे उपाशीपोटी झोपावे लागत आहे. कामाच्या शोधात भटकताना गावाकडील कुटुंबियांची आठवण होते. भविष्यात तरी असा दुष्काळ पडू नये व पुन्हा रोजगाराच्या शोधात भटकंती करण्याची वेळ येऊ नये.
किसन माळी, शेतकरी, जालना
---------
मुंबईतही फरफट
मुंबईत येऊनही या दुष्काळग्रस्तांची फरफट सुरूच आहे. रहायला घर नसल्यामुळे नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली काहींनी आसरा घेतला आहे. दगडाची चुल करून त्यावर स्वयंपाक केला जात आहे. डासांचा उपद्रव होत असल्यामुळे शेतकरी व त्यांच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकजण दिवसभर मजुरीचे काम करतात आणि रात्री झोपण्यासाठी रेल्वेस्टेशनमध्ये जात आहेत. म्हातार्‍या व्यक्ती रेल्वे स्टेशन व परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत.
------------
फोटो -
०४दुष्काळग्रस्त