मुख्य पान १ साठी जिल्ासाठी ४५ कोटींचे पॅकेज
By admin | Updated: September 2, 2015 23:32 IST
जळगाव : जिल्हाभरातील कृषिपंपाचे व घरगुती वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तातडीने देण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी साडेपाच तास चाललेल्या आढावा बैठकीत ४५ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जिल्हा नियोजन भवनात ही बैठक झाली. या बैठकीत त्यांनी वीज कनेक्शन पेंडिंग राहू नये, म्हणून पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, ...
मुख्य पान १ साठी जिल्ासाठी ४५ कोटींचे पॅकेज
जळगाव : जिल्हाभरातील कृषिपंपाचे व घरगुती वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तातडीने देण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी साडेपाच तास चाललेल्या आढावा बैठकीत ४५ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जिल्हा नियोजन भवनात ही बैठक झाली. या बैठकीत त्यांनी वीज कनेक्शन पेंडिंग राहू नये, म्हणून पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, तातडीने कनेक्शन वीज ग्राहकांना द्यावे, असे आदेश दिले. महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी मुख्यालयी रहावे. ग्राहकांचे प्रश्न तातडीने सोडवावे, जनतेला वेठीस धरू नये. तसेच सद्य:स्थितीत जिल्ातील १ हजार गावांमध्ये भारनियमन सुरू असून येत्या डिसेंबरपर्यंत भारनियमनमुक्त जिल्हा करावा, असे आदेश त्यांनी येथे दिले. महावितरणतर्फे ग्राहकाभिमुख सेवा चांगल्या पद्धतीने दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.