शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पॅकेजमुळे बिहारमध्ये आर्थिक विकास निश्चित

By admin | Updated: September 20, 2015 22:54 IST

१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे बिहारला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट होईल, हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दावा

नवी दिल्ली : १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे बिहारला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट होईल, हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी खोडून काढला आहे. असा दावा करणे हा नितीशकुमार यांचा ‘गैरसमज’ असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.नितीशकुमार यांनी ‘गैरसमजातून’ असा दावा केला असला तरी पुढच्या पाच वर्षांत बिहारला मिळणारा निधी वाढून ४.०८ लाख कोटींपर्यंत जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी जाहीर केलेल्या १.२५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे आता तळागाळात ठोक विकासकामे दिसू लागतील, असा दावाही जेटली यांनी केला आहे.नितीशकुमार यांनी या महिन्यात लिहिलेल्या एका पत्राला मुद्देसूद उत्तर देताना जेटली पुढे म्हणतात, ‘बिहारसाठी पॅकेजची घोषणा हे राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने दर्शविलेल्या अटळ कटिबद्धतेचेच निदर्शक आहे.’जेटली यांनी हे पत्र नितीशकुमार यांना पाठविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय साहाय्यतेत घट केल्यामुळे केंद्रीय करांमधील वाट्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे, असेही जेटली यांनी या पत्रात स्पष्ट केले.