शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

साठी ओलांडलेल्यांचा काळ संपला

By admin | Updated: October 18, 2015 22:21 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील वर्षी मार्च वा त्याआधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, तेव्हा ते आपल्यासोबत नवी टीम घेऊन येतील.

हैदराबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील वर्षी मार्च वा त्याआधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, तेव्हा ते आपल्यासोबत नवी टीम घेऊन येतील. या नव्या व्यवस्थेत साठी ओलांडलेले पक्षनेते केवळ सल्लागाराची भूमिका साकारताना दिसतील, असे संकेत पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी दिले.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रमेश बोलत होते. सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याचा सल्ला देत, पक्षातील परिर्वतनाची प्रक्रिया सहज असेल, यावर रमेश यांनी भर दिला. राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील, तेव्हा ज्येष्ठ नेत्यांना सन्मानपूर्वकच वागणूक मिळेल. मोदींनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांसोबत जे काही केले, तसे राहुल गांधी करतील, असे मला अजिबात वाटत नाही. मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह या प्रत्येकाला ‘सायबेरिया’ला पाठवून दिले; पण राहुल गांधींनी काँग्रेसची सूत्रे आपल्या हातात घेतल्यास ती सूत्रे कुण्या एका व्यक्तीच्या हाती नसतील, तर एक संपूर्ण टीम तिथे असेल. त्याचमुळे ही टीम निवडण्यासाठी राहुल अधिक वेळ घेत आहेत. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना एक सक्षम टीम हवी आहे आणि ती उभी करण्यासाठी, ते वेळ घेत आहेत, असे रमेश म्हणाले.या वर्षाच्या प्रारंभी रमेश यांनी राहुल गांधी २०१५ मध्ये अध्यक्षपद सांभाळतील, असे संकेत दिले होते. मात्र, आता राहुल गांधी टीमची बांधणी करण्यात गुंतले असल्याचे ते म्हणत आहेत.राहुल गांधी अध्यक्षपदाची सूत्रे कधी स्वीकारणार? असे विचारले असता, २०१५ अद्याप संपलेले नाही. कदाचित मार्चपर्यंत हे होईल, असे ते म्हणाले. अर्थात, निश्चित वेळ केवळ सोनिया गांधी आणि स्वत: राहुल गांधी या दोनच व्यक्ती सांगू शकतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावरील नेतृत्व बदल म्हणजे निश्चितपणे एका पिढीचा बदल असतो. १९८४ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान बनले तेव्हा हेच दिसले होते. येत्या काळात काँग्रेसमध्ये तीस व चाळिशीतील नेत्यांना मुख्य भूमिकेत आणावे लागेल. साठी ओलांडलेल्या नेत्यांना काळ आता संपलेला आहे; पण त्यांच्याही अनुभवाचा लाभ घेतला जाईल. त्यांनी स्वत:हून स्वत:चा अनुभव, ज्ञान दिले पाहिजे; पण सत्तरीनंतरच्या नेत्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला गेला पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.