शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

फुटीरतावाद्यांना चपराक, काश्मीर खो-यात बोर्डाच्या परिक्षेला ९५ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

By admin | Updated: November 15, 2016 10:09 IST

शाळांना आगी लावण्याच्या निंदनीय घटना घडत असताना खो-यातील विद्यार्थ्यांनी मात्र आपल्यासाठी शिक्षणच सर्वोच्च असल्याचे दाखवून दिले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. १५ - काश्मीर खो-यात शाळांना आगी लावण्याच्या निंदनीय घटना घडत असताना खो-यातील विद्यार्थ्यांनी मात्र आपल्यासाठी शिक्षणच सर्वोच्च असल्याचे दाखवून दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कालपासून बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेला सुरुवात झाली असून राज्यातील तब्बल ९५ टक्के मुलांची परिक्षाकेंद्रांवर हजेरी नोंदवण्यात आली. 
 
हा आकडा फुटीरतावाद्यांना एक सणसणीत चपराक आहे. कारण फुटीरतावाद्यांनी शाळा-कॉलेजेस उघडायला विरोध केला होता. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला सुरक्षापथकांनी कंठस्नान घातल्यापासून काश्मीर खो-यात प्रचंड अस्वस्थतता आहे. मागच्या चार महिन्यांपासून हिंसक विरोध प्रदर्शनामुळे शाळा-कॉलेजेस बंद आहेत. 
 
या आंदोलनांचा खो-यातील शिक्षणाला मोठा फटका बसला आहे. मागच्या चार महिन्यांपासून शाळा सुरु नसल्याने काश्मीरमध्ये बोर्डाच्या परिक्षेसाठी अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी कमी करण्यात आला. आजपासून १० बोर्डाची परिक्षा सुरु होत असून खो-यातील १ हजार परिक्षा केंद्रांवर परिक्षा होणार आहे. तीन डिसेंबरपर्यंत या दोन्ही परिक्षा चालणार आहेत. काश्मीरमध्ये आतापर्यंत ३० पेक्षा जास्त शाळांना आगी लावण्याच्या निंदनीय घटना घडल्या आहे.