शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘आउटडेटेड’ सरकार लोकांनीच नाकारले; पंतप्रधान मोदी यांची ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 06:22 IST

बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता. त्यामुळे २०१४ मध्ये लोकांनी असे कालबाह्य ‘फोन’ सोडून दिले आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘२०१४ हे वर्ष केवळ तारीख नसून बदल आहे. लोकांनी तत्कालीन ‘आऊटडेटेड’ सरकारला जुन्या स्क्रीन असलेल्या फोनप्रमाणे नाकारले आणि आमच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला संधी दिली,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केली. 

येथे ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ मधील आपल्या भाषणातील आकडेवारीचा हवाला देत मोदी यांनी भारत मोबाइल फोनचा आयातदार असताना निर्यातदार कसा बनला आणि ॲपलपासून गुगलपर्यंतच्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या देशात उत्पादन बनण्यास कशा तयार आहेत, याची माहिती दिली. 

मोदी म्हणाले, “वर्ष २०१४ मध्ये, आमच्याकडे... मी २०१४ का म्हणतोय... ती तारीख नाही, तर बदल आहे. २०१४ पूर्वी भारतात काही शेकड्यांत स्टार्टअप होते पण आता ही संख्या एक लाखाच्या आसपास पोहोचली आहे.

जग आता ‘मेड इन इंडिया’ फोन वापरतेय 

सर्वात वेगवान ५ जी मोबाइल टेलिफोन नेटवर्क लाँच केल्यानंतर, भारत ६ जी क्षेत्रात एक आघाडीचा देश म्हणून प्रस्थापित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जग आता ‘मेड इन इंडिया’ फोन वापरत आहेत, असेही मोदी म्हणाले. मोबाइल ब्रॉडबँड गतीच्या बाबतीत भारत ११८ व्या स्थानावरून ४३ व्या स्थानावर गेला आहे असा उल्लेखही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला.

बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता...

२०१४ पूर्वीच्या दिवसांची आठवण करून देताना मोदी म्हणाले की, त्यावेळी ‘आऊटडेटेड फोन’ची स्क्रीन वेळोवेळी हँग व्हायची. तुम्ही कितीही स्क्रीन स्वाइप केली किंवा कितीही बटणे दाबली तरी काहीही परिणाम होत नव्हता... आणि त्यावेळच्या सरकारचीही अशीच परिस्थिती होती. त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था किंवा तत्कालीन सरकारचीच म्हणायला हवे, परिस्थिती इतकी बिकट होती की, पुन्हा सुरू करूनही फायदा झाला नाही. बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता. त्यामुळे २०१४ मध्ये लोकांनी असे कालबाह्य ‘फोन’ सोडून दिले आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. या बदलामुळे काय झाले तेही स्पष्टपणे दिसून येत आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी