शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 06:13 IST

विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले.

इंफाळ : मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून शुक्रवारी रात्री विष्णूपूर जिल्ह्यात मैतेई समुदायातील तीन लोकांची हत्या करण्यात आली. तसेच कुकी समुदायातील लोकांच्या अनेक घरांना आग लावण्यात आली. राज्यातील अनेक भागात मागील २४ तासांपासून गोळीबार सुरू आहे. 

विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले. विष्णूपूर जिल्ह्यातील क्वाक्टा भागापासून दाेन किलोमीटरनंतर केंद्रीय सुरक्षा दलांनी बफर झोन तयार केला आहे. 

त्याआधी गुरुवारी सायंकाळी विष्णूपूरमध्ये अनेक भागांत गोळीबारानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. हिंसक जमावाची सुरक्षा दलांसोबत चकमक झडली. या भागात सुरक्षा दलांनी सात भूमिगत बंकर उद्ध्वस्त केले आहेत. (वृत्तसंस्था) 

मृतांमध्ये पिता-पुत्राचा समावेशशुक्रवारी रात्री मारल्या गेलेल्या ३ जणांत एका पिता-पुत्राच्या जोडीचा समावेश आहे. विष्णूपूरजवळील क्वाक्टा येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर झोपेतच गोळ्या झाडल्या. मारले गेलेले दुपारीच निर्वासित छावण्यातून घरी परतले होते. हत्याकांडाचे वृत्त आल्यानंतर क्वाक्टामध्ये मोठा जमाव जमला. चालून जाण्या आधीच जमावाला सुरक्षा दलांनी रोखले. यावेळी उडालेल्या चकमकीत पोलिसासह ३ जण जखमी झाले.

शिथिल केलेली संचारबंदी पुन्हा लागूविष्णूपूर जिल्ह्यातील दुसऱ्या आयआरबी युनिटच्या छावण्यांवर हिंसक जमावाने हल्ला करून शस्त्रास्त्रे व दारूगाेळा लुटून नेला. मणिपूर राइफल्सची दुसरी बटालियन आणि ७ टीयू  बटालियनची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा लुटण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी सुरक्षा दले आणि हिंसक जमाव यांच्यात चकमक उडाली. हिंसाचारामुळे शिथिल करण्यात आलेली संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे.

१६० हून अधिक बळी मैतेई समुदायास अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या विरोधात कुकी समुदायाने सुरू केलेल्या आंदोलनातून मणिपुरातील संघर्ष निर्माण झाला. हिंसाचारात आतापर्यंत १६० पेक्षाही अधिक लोक ठार झाले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. मणिपुरात मैतेई समुदायाची संख्या सुमारे ५३ टक्के असून ते इम्फाळ खोऱ्यात राहतात. 

जनजीवन विस्कळीतमणिपुरातील समन्वय समितीने दिलेल्या मणिपूर बंदच्या हाकेमुळे शनिवारी जनजीवन विस्कळीत झाले. शाळा-महाविद्यालये तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सर्व व्यवहार बंद राहिले. पहाडी भागात मात्र बंदचा परिणाम दिसून आला नाही. समितीचे समन्वयक एल. बिनोद यांनी सांगितले की, सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार