शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 06:13 IST

विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले.

इंफाळ : मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून शुक्रवारी रात्री विष्णूपूर जिल्ह्यात मैतेई समुदायातील तीन लोकांची हत्या करण्यात आली. तसेच कुकी समुदायातील लोकांच्या अनेक घरांना आग लावण्यात आली. राज्यातील अनेक भागात मागील २४ तासांपासून गोळीबार सुरू आहे. 

विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले. विष्णूपूर जिल्ह्यातील क्वाक्टा भागापासून दाेन किलोमीटरनंतर केंद्रीय सुरक्षा दलांनी बफर झोन तयार केला आहे. 

त्याआधी गुरुवारी सायंकाळी विष्णूपूरमध्ये अनेक भागांत गोळीबारानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. हिंसक जमावाची सुरक्षा दलांसोबत चकमक झडली. या भागात सुरक्षा दलांनी सात भूमिगत बंकर उद्ध्वस्त केले आहेत. (वृत्तसंस्था) 

मृतांमध्ये पिता-पुत्राचा समावेशशुक्रवारी रात्री मारल्या गेलेल्या ३ जणांत एका पिता-पुत्राच्या जोडीचा समावेश आहे. विष्णूपूरजवळील क्वाक्टा येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर झोपेतच गोळ्या झाडल्या. मारले गेलेले दुपारीच निर्वासित छावण्यातून घरी परतले होते. हत्याकांडाचे वृत्त आल्यानंतर क्वाक्टामध्ये मोठा जमाव जमला. चालून जाण्या आधीच जमावाला सुरक्षा दलांनी रोखले. यावेळी उडालेल्या चकमकीत पोलिसासह ३ जण जखमी झाले.

शिथिल केलेली संचारबंदी पुन्हा लागूविष्णूपूर जिल्ह्यातील दुसऱ्या आयआरबी युनिटच्या छावण्यांवर हिंसक जमावाने हल्ला करून शस्त्रास्त्रे व दारूगाेळा लुटून नेला. मणिपूर राइफल्सची दुसरी बटालियन आणि ७ टीयू  बटालियनची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा लुटण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी सुरक्षा दले आणि हिंसक जमाव यांच्यात चकमक उडाली. हिंसाचारामुळे शिथिल करण्यात आलेली संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे.

१६० हून अधिक बळी मैतेई समुदायास अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या विरोधात कुकी समुदायाने सुरू केलेल्या आंदोलनातून मणिपुरातील संघर्ष निर्माण झाला. हिंसाचारात आतापर्यंत १६० पेक्षाही अधिक लोक ठार झाले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. मणिपुरात मैतेई समुदायाची संख्या सुमारे ५३ टक्के असून ते इम्फाळ खोऱ्यात राहतात. 

जनजीवन विस्कळीतमणिपुरातील समन्वय समितीने दिलेल्या मणिपूर बंदच्या हाकेमुळे शनिवारी जनजीवन विस्कळीत झाले. शाळा-महाविद्यालये तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सर्व व्यवहार बंद राहिले. पहाडी भागात मात्र बंदचा परिणाम दिसून आला नाही. समितीचे समन्वयक एल. बिनोद यांनी सांगितले की, सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार