शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

करिअर पोर्टलवर उपलब्ध ९०.४७ लाख नोकऱ्यांपैकी अवघ्या ३.५ टक्के जागांवर पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:28 IST

राष्ट्रीय करिअर पोर्टल २०१५ साली केंद्रीय कामगार खात्यातर्फे सुरू करण्यात आले. त्या पोर्टलवर कोणालाही नोकरीसाठी मोफत नावनोंदणी करता येते.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार दिल्याचा केंद्र सरकार दावा करत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राष्ट्रीय करिअर पोर्टलवर उपलब्ध झालेल्या ९०.४७ लाख नोकऱ्यांपैकी अवघ्या ३.५ टक्के जागांवर पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय कामगार खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत सांगितले की, पोर्टलवर ४ नोव्हेंबरपर्यंत ९०.४७ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या. त्यात ३.१६ लाख उमेदवारांना नोकरीकरिता नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर तेली म्हणाले की, करिअर सेवा मध्ये रोजगार कार्यालयांना परस्परांशी जोडण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रातील यवतमाळला (३०.४० लाख), उस्मानाबाद (२६.३७ लाख), ठाणे (२४.७९ लाख) अशी ८१.५६ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. इंटरलिकिंग योजनेच्या अंतर्गत ३.६० कोटी रुपये देण्यात आले. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये १.१० कोटी होती. त्यामध्ये ६७ लाख पुरुष व ३४ लाख महिला उमेदवार होत्या. या पोर्टलवर उपलब्ध प्रत्येक नोकरीसाठी सरासरी ७५ उमेदवारांनी अर्ज केला होता. महाराष्ट्रातील ११.०६ लाख, लोकांनी नोकऱ्यांसाठी अर्ज केले होते.

मोफत नावनोंदणीराष्ट्रीय करिअर पोर्टल २०१५ साली केंद्रीय कामगार खात्यातर्फे सुरू करण्यात आले. त्या पोर्टलवर कोणालाही नोकरीसाठी मोफत नावनोंदणी करता येते. त्यामुळेही या पोर्टलला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र या पोर्टलव्दारे लोकांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार