शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

मागच्याच जोशात दिल्लीत पुन्हा येणार 'आप'चे सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 06:49 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विश्वास

विकास झाडे 

नवी दिल्ली : प्रतिकूल परिस्थिती असतानाही ‘आप’ सरकार जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध होती. आम्ही संघर्ष केला आणि पाच वर्षांत विविध योजना राबविण्यात यशस्वी झालो. दिल्लीतील सर्वच नागरिक आपच्या योजनांचे लाभार्थी ठरले आहेत. त्यामुळे दिल्लीकर पुन्हा आम आदमीचे सरकार आणेल यावर माझा विश्वास असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लोकमत एडिटोरिअल बोर्डा’चे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी चर्चा केली.

लोकसहभागामुळेच आज दिल्लीत सम-विषम यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपेक्षा आज दिल्लीतील प्रदूषण कमी झाले आहे. ज्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत त्याचे राजकारण होऊ नये. परंतु दुर्देवाने भाजप तसे वागत आहे. दिल्लीतील शेजारच्या राज्यांनी आणि केंद्र सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला तर दिल्लीतील हवा जीवघेणी ठरणार नाही.आमच्या सरकारमुळे शाळांचा कायापालट झाला आहे. गरीबांची मुले पंचतारांकीत शाळेत जायला लागली. त्यामुळे लोकांना या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गर्दी करावी लागत आहे, असा दावा करून ते म्हणाले की, दिल्लीत लोकांना पाणी मोफत मिळू लागले आहे. मोहल्ला क्लिनिकमुळे रुग्णांवर उत्तम उपचार होऊ लागले असून मोफत औषधांमुळे खर्च शून्यावर आला आहे. २०० युनिटपर्यंत वीज बिलावर शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये आकस्मिक रुग्णांवर उपचाराची जबाबदारी सरकारने उचलली आहे.

नायब राज्यपाल अनिल बैजल हे चांगले गृहस्थ आहेत. दिल्लीचा विकास व्हावा असे त्यांनाही वाटते. सुरुवातीला ते आमच्यासोबत चर्चा करायचे, मात्र त्यांचा सहभाग अचानक बंद झाला. केजरीवालांच्या कार्यक्रमात तुम्ही कसे? असे विचारणा त्यांना केंद्राकडून झाली असावी, असेही केजरीवाल म्हणाले.बंदे में है दम...विजय दर्डा यांनी केजरीवाल यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. लोकमतचा दीपभव आणि दीपोत्सव हे अंक सप्रेम भेट दिले. याप्रसंगी केजरीवाल यांच्या नेतृत्वातील दिल्ली सरकारच्या विविध योजना आणि विकासकामांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेल्या संकलित लोकमतच्या वृत्तांचे ‘बंदे में है दम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.महाराष्ट्रात सरकार लवकर स्थापन व्हावे!महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल लागून बारा दिवस ओलांडले तरीही सरकार बसायचे आहे. यावर केजरीवाल यांनी दर्डा यांच्याकडे खंत व्यक्त केली. महाराष्ट्रात विविध समस्या आहेत.शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आहेत. लोकांनी ज्यांच्यावर विश्वास दाखविला त्यांनी सरकार न बनवता पदांसाठी भांडणे हा मतदारांचा विश्वासघात आहे. महाराष्टÑात लवकर सरकार व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली