शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

मागच्याच जोशात दिल्लीत पुन्हा येणार 'आप'चे सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 06:49 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विश्वास

विकास झाडे 

नवी दिल्ली : प्रतिकूल परिस्थिती असतानाही ‘आप’ सरकार जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध होती. आम्ही संघर्ष केला आणि पाच वर्षांत विविध योजना राबविण्यात यशस्वी झालो. दिल्लीतील सर्वच नागरिक आपच्या योजनांचे लाभार्थी ठरले आहेत. त्यामुळे दिल्लीकर पुन्हा आम आदमीचे सरकार आणेल यावर माझा विश्वास असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लोकमत एडिटोरिअल बोर्डा’चे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी चर्चा केली.

लोकसहभागामुळेच आज दिल्लीत सम-विषम यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपेक्षा आज दिल्लीतील प्रदूषण कमी झाले आहे. ज्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत त्याचे राजकारण होऊ नये. परंतु दुर्देवाने भाजप तसे वागत आहे. दिल्लीतील शेजारच्या राज्यांनी आणि केंद्र सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला तर दिल्लीतील हवा जीवघेणी ठरणार नाही.आमच्या सरकारमुळे शाळांचा कायापालट झाला आहे. गरीबांची मुले पंचतारांकीत शाळेत जायला लागली. त्यामुळे लोकांना या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गर्दी करावी लागत आहे, असा दावा करून ते म्हणाले की, दिल्लीत लोकांना पाणी मोफत मिळू लागले आहे. मोहल्ला क्लिनिकमुळे रुग्णांवर उत्तम उपचार होऊ लागले असून मोफत औषधांमुळे खर्च शून्यावर आला आहे. २०० युनिटपर्यंत वीज बिलावर शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये आकस्मिक रुग्णांवर उपचाराची जबाबदारी सरकारने उचलली आहे.

नायब राज्यपाल अनिल बैजल हे चांगले गृहस्थ आहेत. दिल्लीचा विकास व्हावा असे त्यांनाही वाटते. सुरुवातीला ते आमच्यासोबत चर्चा करायचे, मात्र त्यांचा सहभाग अचानक बंद झाला. केजरीवालांच्या कार्यक्रमात तुम्ही कसे? असे विचारणा त्यांना केंद्राकडून झाली असावी, असेही केजरीवाल म्हणाले.बंदे में है दम...विजय दर्डा यांनी केजरीवाल यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. लोकमतचा दीपभव आणि दीपोत्सव हे अंक सप्रेम भेट दिले. याप्रसंगी केजरीवाल यांच्या नेतृत्वातील दिल्ली सरकारच्या विविध योजना आणि विकासकामांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेल्या संकलित लोकमतच्या वृत्तांचे ‘बंदे में है दम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.महाराष्ट्रात सरकार लवकर स्थापन व्हावे!महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल लागून बारा दिवस ओलांडले तरीही सरकार बसायचे आहे. यावर केजरीवाल यांनी दर्डा यांच्याकडे खंत व्यक्त केली. महाराष्ट्रात विविध समस्या आहेत.शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आहेत. लोकांनी ज्यांच्यावर विश्वास दाखविला त्यांनी सरकार न बनवता पदांसाठी भांडणे हा मतदारांचा विश्वासघात आहे. महाराष्टÑात लवकर सरकार व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली