शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आपली संस्कृती सर्वांना सामावून घेणारी

By admin | Updated: November 8, 2015 03:17 IST

देशातील वाढत्या असहिष्णुतेवरून सुरू असलेले वादळ आणि त्यानिषेधार्थ अनेक लेखक-कलावंतांनी ‘पुरस्कार वापसी’चे अस्त्र उगारले असताना, भारतीय संस्कृती सहिष्णुतेच्याही

नवी दिल्ली : देशातील वाढत्या असहिष्णुतेवरून सुरू असलेले वादळ आणि त्यानिषेधार्थ अनेक लेखक-कलावंतांनी ‘पुरस्कार वापसी’चे अस्त्र उगारले असताना, भारतीय संस्कृती सहिष्णुतेच्याही पुढे जाऊन सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारी आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली ५१ कलावंत व लेखकांच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली, तेव्हा मोदी यांनी वरील मत व्यक्त केले. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून काही लोकांनी सुरू केलेल्या निषेध आंदोलनाविषयी शिष्टमंडळाने चिंता व्यक्त केली व हा या लोकांचा राजकीय अ‍ॅजेंडा असल्याचा आरोप केला.दिल्लीत काढला ‘मार्च फॉर इंडिया’अनुपम खेर यांच्या नेतृत्वात शनिवारी राष्ट्रपती भवनवर ‘मार्च फॉर इंडिया’ काढण्यात आला आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या शक्तींविरुद्ध एक निवेदन त्यांना देण्यात आले. पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त प्रख्यात नर्तक बिरजू महाराज, प्रसिद्ध लेखक नरेंद्र कोहली, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, अशोक पंडित, प्रियदर्शन, मनोज जोशी, गायक अभिजित भट्टाचार्य, मालिनी अवस्थी, राजा बुंदेला आणि लेखिका मधू किश्वर यांच्यासह अनेक चित्रपट निर्माते व कलाकार राष्ट्रीय संग्रहालयापासून निघालेल्या या मार्चमध्ये सहभागी झाले होते.भारत सहिष्णू आहे. परंतु काही लोकांनी असहिष्णुतेच्या नावावर वाद निर्माण केला आहे. पुरस्कार वापसीच्या मोहिमेद्वारे चुकीचे चित्र निर्माण करून देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खेर यांनी यावेळी केला.