शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

...अन्यथा आम्ही भाजपाचा पाठिंबा घेऊ- जेडीयू

By admin | Updated: July 17, 2017 16:49 IST

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून वेगळी चूल मांडलेला जनता दल युनायटेड पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 17 - राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून वेगळी चूल मांडलेला जनता दल युनायटेड पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप झडले असून, त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र त्याच वेळी बिहारमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा तयार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे जनता दल युनायटेडच्या एका आमदारानं नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेण्याचा सल्ला दिला आहे. भाजपासोबत जनता दल युनायटेडचे चांगले संबंध होते. सद्यस्थितीत नितीश कुमार यांना लहानग्यांसोबत सरकार चालवावं लागतं आहे. तसेच लालूप्रसाद हे बदली आणि बढतीसाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकतात. भाजपा बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासारखीच भ्रष्टाचाराच्या विरोधात असून, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. सुशीलकुमार मोदी म्हणाले, मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी पक्ष तयार नाही, त्याचा बिहार राज्याला कोणताही फायदा होणार नाही. भाजपाचा युती तोडण्यावर विश्वास नाही, या सर्व प्रकरणात संसदीय समिती निर्णय घेईल.

अधिक वाचा

बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोनलालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हामिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादवलालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव

सध्या २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे ८०, संयुक्त जनता दलाचे ७१, काँग्रेसचे २७ आणि भाजपाचे ५३ आमदार आहेत.  दरम्यान, जेडीयू आणि आरजेडीमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मध्यस्थी केली आहे. बिहारमधील महागठबंधनचे सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. 

 

नितीश कुमारांनी या प्रकरणी कणखर भूमिका घेत तेजस्वी यादव संबंधी निर्णय घेण्यासाठी लालुंना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ असावी असा नितीश कुमारांचा आग्रह आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मंत्रिमंडळात राहू नये असे त्यांचे मत आहे. पण तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत अशी भूमिका राजदने घेतली आहे. त्यामुळे बिहारमधील जदयू-राजद-काँग्रेस महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.