शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

...अन्यथा आम्ही भाजपाचा पाठिंबा घेऊ- जेडीयू

By admin | Updated: July 17, 2017 16:49 IST

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून वेगळी चूल मांडलेला जनता दल युनायटेड पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 17 - राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून वेगळी चूल मांडलेला जनता दल युनायटेड पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप झडले असून, त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र त्याच वेळी बिहारमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा तयार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे जनता दल युनायटेडच्या एका आमदारानं नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेण्याचा सल्ला दिला आहे. भाजपासोबत जनता दल युनायटेडचे चांगले संबंध होते. सद्यस्थितीत नितीश कुमार यांना लहानग्यांसोबत सरकार चालवावं लागतं आहे. तसेच लालूप्रसाद हे बदली आणि बढतीसाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकतात. भाजपा बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासारखीच भ्रष्टाचाराच्या विरोधात असून, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. सुशीलकुमार मोदी म्हणाले, मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी पक्ष तयार नाही, त्याचा बिहार राज्याला कोणताही फायदा होणार नाही. भाजपाचा युती तोडण्यावर विश्वास नाही, या सर्व प्रकरणात संसदीय समिती निर्णय घेईल.

अधिक वाचा

बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोनलालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हामिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादवलालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव

सध्या २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे ८०, संयुक्त जनता दलाचे ७१, काँग्रेसचे २७ आणि भाजपाचे ५३ आमदार आहेत.  दरम्यान, जेडीयू आणि आरजेडीमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मध्यस्थी केली आहे. बिहारमधील महागठबंधनचे सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. 

 

नितीश कुमारांनी या प्रकरणी कणखर भूमिका घेत तेजस्वी यादव संबंधी निर्णय घेण्यासाठी लालुंना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ असावी असा नितीश कुमारांचा आग्रह आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मंत्रिमंडळात राहू नये असे त्यांचे मत आहे. पण तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत अशी भूमिका राजदने घेतली आहे. त्यामुळे बिहारमधील जदयू-राजद-काँग्रेस महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.