शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

गोहत्या करणाऱ्यांची हत्या करा हा तर वेदांचाच आदेश

By admin | Updated: October 18, 2015 22:34 IST

‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले

नवी दिल्ली : ‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले असल्याचे नमूद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पांचजन्य’ या मुखपत्रामधून दादरी येथे झालेल्या मोहंमद इकलाख या मुस्लिम व्यक्तीच्या हत्येचे उघड उघड समर्थन केले आहे. इकलाखाची हत्या ‘विनाकारण’ करण्यात आलेली नाही आणि वेदांनीही गोहत्या करणाऱ्यांना ठार मारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही या मुखपत्रात म्हटले आहे.‘इस उत्पात के उस पार’ या मथळ्याखाली ‘पांचजन्य’च्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या लेखातून वेदांचा हवाला देत अशा हत्यांचे समर्थन करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘जो कुणी गोहत्या करेल त्याला ठार मारा असा आदेश वेदाने दिलेला आहे. गाय ही हिंदू समाजासाठी मानबिंदू आहे. आमच्यापैकी बहुतेकांसाठी तर तो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. मदरसे आणि मुस्लिम नेते युवा मुसलमानांना देशाच्या परंपरेचा द्वेष करण्याचे शिकवितात. इकलाखनेही अशाच चुकीच्या सल्ल्यामुळे कदाचित गायीची कुर्बानी दिलेली असावी.’दादरीत यापूर्वी कधीही सांप्रदायिक हिंसाचाराची घटना घडलेली नाही. त्यामुळे इकलाखची हत्या कारणांशिवाय झाली असेल यावर कुणीही विश्वास ठेवू शकणार नाही. प्रत्येक क्रियेची सारखीच प्रतिक्रिया ही असतेच, असे न्यूटनचा नियम सांगतो. शांततेचा इतिहास असलेल्या दादरीत ही घटना (इकलाखच्या हत्येची) कारणांशिवाय घडली नसणारच, असेही या लेखात म्हटले आहे. आताचे मुस्लिम हे कधीकाळी हिंदूच होते. इकलाखचे पूर्वजही पूर्वी हिंदू आणि गोरक्षक होते आणि त्यांनीही अन्य अनेक लोकांप्रमाणे गोहत्या करणाऱ्यांना दंड दिला असणार. हे गोसंरक्षक असे गोहत्या करणारे का बनले असावेत, असा सवालही यात केला आहे.सामाजिक सद्भावनेसाठी एकमेकांच्या भावनांचा सन्मान करणे आवश्यक आहे. भारतात न्यायप्रणाली आहे आणि कुणालाही कायदा हाती घेण्याची परवानगी दिली जाऊ नये हे खरे; परंतु बहुसंख्य समाजाच्या मन:स्थितीचीही चिंता केली पाहिजे, असेही त्यात म्हटले आहे. देशभरातील लेखक आणि साहित्यिकांनी वाढती असहिष्णुता आणि दादरीसारख्या घटनांच्या विरोधात जी ‘पुरस्कार वापसी’ मोहीम सुरू केली आहे, त्यावरही ‘पांचजन्य’ने टीका केली आहे. ‘कहां बचा सन्मान’ या शीर्षकाखाली अनेक लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘विद्यमान रालोआ सरकारच्या नेतृत्वात देश विकासाकडे आगेकूच करीत असल्याचे पाहून भारताविरुद्ध रचलेला हा मोठा कट आहे. हे लेखक व साहित्यिक त्याचे बाहुले बनले आहेत,’ असे एका लेखात म्हटले आहे.त्यात म्हटले आहे की, ‘हल्ली साहित्य क्षेत्रातील काही नावे प्रसिद्धी मिळविण्याच्या स्पर्धेत उतरली आहेत. एका विशिष्ट गटाचे नेतृत्व करण्याचा दावा करीत असलेल्या या साहित्यिकांनी निवडक घटनांच्या आडून पुरस्कार परत करण्याची सुरुवात केली आहे; पण अन्य घटनांवर मात्र ते मौन पाळून आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)