शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्या करणाऱ्यांची हत्या करा हा तर वेदांचाच आदेश

By admin | Updated: October 18, 2015 22:34 IST

‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले

नवी दिल्ली : ‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले असल्याचे नमूद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पांचजन्य’ या मुखपत्रामधून दादरी येथे झालेल्या मोहंमद इकलाख या मुस्लिम व्यक्तीच्या हत्येचे उघड उघड समर्थन केले आहे. इकलाखाची हत्या ‘विनाकारण’ करण्यात आलेली नाही आणि वेदांनीही गोहत्या करणाऱ्यांना ठार मारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही या मुखपत्रात म्हटले आहे.‘इस उत्पात के उस पार’ या मथळ्याखाली ‘पांचजन्य’च्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या लेखातून वेदांचा हवाला देत अशा हत्यांचे समर्थन करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘जो कुणी गोहत्या करेल त्याला ठार मारा असा आदेश वेदाने दिलेला आहे. गाय ही हिंदू समाजासाठी मानबिंदू आहे. आमच्यापैकी बहुतेकांसाठी तर तो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. मदरसे आणि मुस्लिम नेते युवा मुसलमानांना देशाच्या परंपरेचा द्वेष करण्याचे शिकवितात. इकलाखनेही अशाच चुकीच्या सल्ल्यामुळे कदाचित गायीची कुर्बानी दिलेली असावी.’दादरीत यापूर्वी कधीही सांप्रदायिक हिंसाचाराची घटना घडलेली नाही. त्यामुळे इकलाखची हत्या कारणांशिवाय झाली असेल यावर कुणीही विश्वास ठेवू शकणार नाही. प्रत्येक क्रियेची सारखीच प्रतिक्रिया ही असतेच, असे न्यूटनचा नियम सांगतो. शांततेचा इतिहास असलेल्या दादरीत ही घटना (इकलाखच्या हत्येची) कारणांशिवाय घडली नसणारच, असेही या लेखात म्हटले आहे. आताचे मुस्लिम हे कधीकाळी हिंदूच होते. इकलाखचे पूर्वजही पूर्वी हिंदू आणि गोरक्षक होते आणि त्यांनीही अन्य अनेक लोकांप्रमाणे गोहत्या करणाऱ्यांना दंड दिला असणार. हे गोसंरक्षक असे गोहत्या करणारे का बनले असावेत, असा सवालही यात केला आहे.सामाजिक सद्भावनेसाठी एकमेकांच्या भावनांचा सन्मान करणे आवश्यक आहे. भारतात न्यायप्रणाली आहे आणि कुणालाही कायदा हाती घेण्याची परवानगी दिली जाऊ नये हे खरे; परंतु बहुसंख्य समाजाच्या मन:स्थितीचीही चिंता केली पाहिजे, असेही त्यात म्हटले आहे. देशभरातील लेखक आणि साहित्यिकांनी वाढती असहिष्णुता आणि दादरीसारख्या घटनांच्या विरोधात जी ‘पुरस्कार वापसी’ मोहीम सुरू केली आहे, त्यावरही ‘पांचजन्य’ने टीका केली आहे. ‘कहां बचा सन्मान’ या शीर्षकाखाली अनेक लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘विद्यमान रालोआ सरकारच्या नेतृत्वात देश विकासाकडे आगेकूच करीत असल्याचे पाहून भारताविरुद्ध रचलेला हा मोठा कट आहे. हे लेखक व साहित्यिक त्याचे बाहुले बनले आहेत,’ असे एका लेखात म्हटले आहे.त्यात म्हटले आहे की, ‘हल्ली साहित्य क्षेत्रातील काही नावे प्रसिद्धी मिळविण्याच्या स्पर्धेत उतरली आहेत. एका विशिष्ट गटाचे नेतृत्व करण्याचा दावा करीत असलेल्या या साहित्यिकांनी निवडक घटनांच्या आडून पुरस्कार परत करण्याची सुरुवात केली आहे; पण अन्य घटनांवर मात्र ते मौन पाळून आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)